अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या २७४ पर्यंत वाढली आहे वाढली आहे. विमान कोसळून जमिनीवर जखमी झालेल्या आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे.



लंडनच्या गेटवीक विमानतळाकडे झेपावलेले विमान फ्लाइट एआय १७१ हे गुरूवारी उड्डाण केल्याच्या अवघ्या काही सेकंदामध्येच अहमदाबादच्या बीजे मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीनच्या इमारतीवर कोसळलं होतं.या अपघातात विमानातील आणि मेडिकल कॉलेज मधील २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले होते.या दुर्घटना झालेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते, ज्यापैकी २३० हे प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. बचावलेला व्यक्ती हा मूळ भारतीय असलेला ब्रिटीश नागरिक आहे.


अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (AFES) ने गेल्या २४ तासांत मेघानीनगर परिसरातील विमान अपघात स्थळावरून म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहाच्या परिसरातून काही मानवी शरीराचे अवयव तसेच एक मृतदेह ताब्यात घेतले आहेत.डीएनएचे नमुने घेऊन पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, आणि त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवले जाणार आहेत.


अतिरिक्त मुख्य अग्निशामक अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितलं की विमानाचे शेपूट हे कॅन्टीन इमारतीवर अडकले होते, ते क्रेनच्या मदतीने खाली घेण्यात आले आहे.


२०११ मध्ये व्यावसायिक वापर सुरू झाल्यानंतर बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा अपघात हा या प्रकारच्या विमानाचा पहिलाच अपघात ठरला आहे.विमान अपघाताची चौकशी करणारी संस्था एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)ने एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या २८ तासांनंतर ताब्यात घेतला आहे. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली.



टाटा ग्रुप देणार मदत


टाटा ग्रुपने एक निवेदन जारी करत विमानाच्या बाहेर असलेल्या मृतांना देखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार आहे. जखमींना सर्वतोपरी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे. विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांमध्ये मेघानीनगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बोईंग ड्रीमलायनर अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारती

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी