अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या २७४ पर्यंत वाढली आहे वाढली आहे. विमान कोसळून जमिनीवर जखमी झालेल्या आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे.



लंडनच्या गेटवीक विमानतळाकडे झेपावलेले विमान फ्लाइट एआय १७१ हे गुरूवारी उड्डाण केल्याच्या अवघ्या काही सेकंदामध्येच अहमदाबादच्या बीजे मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीनच्या इमारतीवर कोसळलं होतं.या अपघातात विमानातील आणि मेडिकल कॉलेज मधील २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले होते.या दुर्घटना झालेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते, ज्यापैकी २३० हे प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. बचावलेला व्यक्ती हा मूळ भारतीय असलेला ब्रिटीश नागरिक आहे.


अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (AFES) ने गेल्या २४ तासांत मेघानीनगर परिसरातील विमान अपघात स्थळावरून म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहाच्या परिसरातून काही मानवी शरीराचे अवयव तसेच एक मृतदेह ताब्यात घेतले आहेत.डीएनएचे नमुने घेऊन पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, आणि त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवले जाणार आहेत.


अतिरिक्त मुख्य अग्निशामक अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितलं की विमानाचे शेपूट हे कॅन्टीन इमारतीवर अडकले होते, ते क्रेनच्या मदतीने खाली घेण्यात आले आहे.


२०११ मध्ये व्यावसायिक वापर सुरू झाल्यानंतर बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा अपघात हा या प्रकारच्या विमानाचा पहिलाच अपघात ठरला आहे.विमान अपघाताची चौकशी करणारी संस्था एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)ने एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या २८ तासांनंतर ताब्यात घेतला आहे. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली.



टाटा ग्रुप देणार मदत


टाटा ग्रुपने एक निवेदन जारी करत विमानाच्या बाहेर असलेल्या मृतांना देखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार आहे. जखमींना सर्वतोपरी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे. विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांमध्ये मेघानीनगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बोईंग ड्रीमलायनर अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारती

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ