अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या २७४ पर्यंत वाढली आहे वाढली आहे. विमान कोसळून जमिनीवर जखमी झालेल्या आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे.



लंडनच्या गेटवीक विमानतळाकडे झेपावलेले विमान फ्लाइट एआय १७१ हे गुरूवारी उड्डाण केल्याच्या अवघ्या काही सेकंदामध्येच अहमदाबादच्या बीजे मेडिकल हॉस्टेल आणि कॅन्टीनच्या इमारतीवर कोसळलं होतं.या अपघातात विमानातील आणि मेडिकल कॉलेज मधील २६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले होते.या दुर्घटना झालेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते, ज्यापैकी २३० हे प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. बचावलेला व्यक्ती हा मूळ भारतीय असलेला ब्रिटीश नागरिक आहे.


अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (AFES) ने गेल्या २४ तासांत मेघानीनगर परिसरातील विमान अपघात स्थळावरून म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृहाच्या परिसरातून काही मानवी शरीराचे अवयव तसेच एक मृतदेह ताब्यात घेतले आहेत.डीएनएचे नमुने घेऊन पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, आणि त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवले जाणार आहेत.


अतिरिक्त मुख्य अग्निशामक अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितलं की विमानाचे शेपूट हे कॅन्टीन इमारतीवर अडकले होते, ते क्रेनच्या मदतीने खाली घेण्यात आले आहे.


२०११ मध्ये व्यावसायिक वापर सुरू झाल्यानंतर बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा अपघात हा या प्रकारच्या विमानाचा पहिलाच अपघात ठरला आहे.विमान अपघाताची चौकशी करणारी संस्था एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB)ने एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या २८ तासांनंतर ताब्यात घेतला आहे. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली.



टाटा ग्रुप देणार मदत


टाटा ग्रुपने एक निवेदन जारी करत विमानाच्या बाहेर असलेल्या मृतांना देखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार आहे. जखमींना सर्वतोपरी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे. विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांमध्ये मेघानीनगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बोईंग ड्रीमलायनर अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारती

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे