जिल्ह्यातील ६५४ गावांत राबविणार जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान

१५ जूनपासून जनजागृती मोहिमेला प्रारंभ


पालघर:आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तिकरणासाठी केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यातयेणार आहे.


या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर उपलब्ध करून देणे होय. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे.


जव्हार १०७, मोखाडा ५३, विक्रमगड ९३, वाडा ८७, पालघर ९२, तलासरी ३७, डहाणू १६३ आणि वसई तालुक्यातील २२ गावांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान गावांमध्ये शिबीरे आयोजित करून नागरिकांना आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, पीएम किसान योजना व जनधन खाते उघडने, तसेच सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.


याशिवाय आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसूल आदी विभागांमार्फत विविध लाभ योजना प्रत्यक्ष दिल्या जाणार आहेत.या अभियानामुळे आदिवासी समुदायाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला असून, सर्व संबंधित विभागांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या

राज्यातील भाजपा खासदाराचा पहाटे भीषण अपघात, एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले

पालघर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (MP Dr.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे