जिल्ह्यातील ६५४ गावांत राबविणार जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान

१५ जूनपासून जनजागृती मोहिमेला प्रारंभ


पालघर:आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तिकरणासाठी केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यातयेणार आहे.


या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर उपलब्ध करून देणे होय. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे.


जव्हार १०७, मोखाडा ५३, विक्रमगड ९३, वाडा ८७, पालघर ९२, तलासरी ३७, डहाणू १६३ आणि वसई तालुक्यातील २२ गावांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान गावांमध्ये शिबीरे आयोजित करून नागरिकांना आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, पीएम किसान योजना व जनधन खाते उघडने, तसेच सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.


याशिवाय आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसूल आदी विभागांमार्फत विविध लाभ योजना प्रत्यक्ष दिल्या जाणार आहेत.या अभियानामुळे आदिवासी समुदायाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला असून, सर्व संबंधित विभागांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Vasai Railway Station Viral Video : जीवाशी खेळ! वसई स्थानकावरील VIDEO पाहून नेटकरी संतापले

वसई : मुंबई उपनगरीय रेल्वेत (Mumbai Suburban Railway) प्रवाशांकडून निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात घालणाऱ्या घटना वारंवार समोर

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal