सेल्फी वेड्यांची विकृती, विमान अपघातानंतर रस्त्यावर पडले महिलेचे शीर, लोकांनी त्यासोबतच घेतले सेल्फी

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण देश हादरला. एअर इंडियाच्या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि काही वेळातच विमानाचे नियंत्रण सुटले आणि मेघानी नगर परिसरात अपघात झाला. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर मोठी आग लागली होती. घटनास्थळी जळालेले अवशेष, धूर आणि लोकांचे मृतदेह विखुरले होते. हे दृश्य पाहून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.


विमान क्रॅश झाल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने अपघाताची तीव्रता खूप जास्त होती. विमानाचे काही भाग इमारतींवर आदळले. त्यामुळे त्याठिकाणीही नुकसान झाले. घटनास्थळी मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. विमानाचे अवशेष जळालेल्या अवस्थेत होते. मानवी मृतदेह आणि त्यांचे अवयव विखुरलेले होते. अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. काही मृतदेह अर्धवट जळाले होते, तर काही पूर्णत: जळाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


अपघातानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्यापैकी एकाने असे कृत्य उघड केले की सर्वांनाच लाज वाटेल. एका महिलेचे डोके कापले गेले होते. शीर रस्त्यावर पडले होते. काही लोक मदतीला धावून जाण्याऐवजी डोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेत होते. ते त्याचे व्हिडिओ बनवत होते. हे पाहून "माणुसकी संपली का?" असा प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला