सेल्फी वेड्यांची विकृती, विमान अपघातानंतर रस्त्यावर पडले महिलेचे शीर, लोकांनी त्यासोबतच घेतले सेल्फी

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण देश हादरला. एअर इंडियाच्या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि काही वेळातच विमानाचे नियंत्रण सुटले आणि मेघानी नगर परिसरात अपघात झाला. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर मोठी आग लागली होती. घटनास्थळी जळालेले अवशेष, धूर आणि लोकांचे मृतदेह विखुरले होते. हे दृश्य पाहून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.


विमान क्रॅश झाल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने अपघाताची तीव्रता खूप जास्त होती. विमानाचे काही भाग इमारतींवर आदळले. त्यामुळे त्याठिकाणीही नुकसान झाले. घटनास्थळी मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. विमानाचे अवशेष जळालेल्या अवस्थेत होते. मानवी मृतदेह आणि त्यांचे अवयव विखुरलेले होते. अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. काही मृतदेह अर्धवट जळाले होते, तर काही पूर्णत: जळाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


अपघातानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्यापैकी एकाने असे कृत्य उघड केले की सर्वांनाच लाज वाटेल. एका महिलेचे डोके कापले गेले होते. शीर रस्त्यावर पडले होते. काही लोक मदतीला धावून जाण्याऐवजी डोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेत होते. ते त्याचे व्हिडिओ बनवत होते. हे पाहून "माणुसकी संपली का?" असा प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Comments
Add Comment

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक