मुलाला भेटायला निघाले आई वडील; काळाने घातला घाला

अहमदाबाद : एअर इंडियाचे AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही मिनिटांमध्येच कोसळले. या विमानातून तब्बल २४२ लोक प्रवास करत होते. विमान क्रॅश होण्याच्या अगोदर पायलटने ATC ला ‘मेडे’कॉल केला होता. मात्र, त्यानंतर ATC चा विमानासोबत संपर्क होऊ शकला नाही. या विमान अपघाताचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.



अपघातानंतर लगेचच मदतकार्य सुरू झाले आहे.या विमानातील एक प्रवासी जिवंत असल्याची माहिती पुढे आली आहे. हेच नाही तर अपघातानंतरचा त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विमानाने दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. मात्र, पुढील काही सेकंदात हे विमान एका मेडिकल कॉलेज च्या कँटिनवर कोसळले . ज्यावेळी हे विमान कोसळले, त्यावेळी मोठा स्फोट देखील झाला.यात विमानातील २४१ प्रवासी आणि मेडिकल कॉलेज मधील काही विद्यार्थी यात मृत्युमुखी पडले. आता एक मोठी माहिती पुढे आलीये. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि आशा पवार हे दाम्पत्य देखील होते. दोघेजण आपल्या मुलाकडे लंडनला निघाले होते. त्यांचा मुलगा लंडनमध्ये असल्याने हे दोघे लेकाच्या भेटीसाठी जात होते.परंतु काळाने घाला घातला आणि ते दोघेही या अपघातात दगावले.


विमान अपघातानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडले. यावेळी हा विमान अपघात झाला, त्यावेळी विद्यार्थी जेवण करत होते. एअर इंडियाचे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी तर काहींचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १:३९ वाजता रनवे २३ वरून या विमानाने आकाशाकडे झेप घेतली.


उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३५ सेकंदामध्ये अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला आहे. पायलटने मेडे कॉल देखील केला होता. मात्र, लँडिंगच्या अगोदरच विमानाचा अपघात झाला. अमित शाह हे देखील अहमदाबादमध्ये पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या