मुलाला भेटायला निघाले आई वडील; काळाने घातला घाला

अहमदाबाद : एअर इंडियाचे AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही मिनिटांमध्येच कोसळले. या विमानातून तब्बल २४२ लोक प्रवास करत होते. विमान क्रॅश होण्याच्या अगोदर पायलटने ATC ला ‘मेडे’कॉल केला होता. मात्र, त्यानंतर ATC चा विमानासोबत संपर्क होऊ शकला नाही. या विमान अपघाताचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.



अपघातानंतर लगेचच मदतकार्य सुरू झाले आहे.या विमानातील एक प्रवासी जिवंत असल्याची माहिती पुढे आली आहे. हेच नाही तर अपघातानंतरचा त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विमानाने दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. मात्र, पुढील काही सेकंदात हे विमान एका मेडिकल कॉलेज च्या कँटिनवर कोसळले . ज्यावेळी हे विमान कोसळले, त्यावेळी मोठा स्फोट देखील झाला.यात विमानातील २४१ प्रवासी आणि मेडिकल कॉलेज मधील काही विद्यार्थी यात मृत्युमुखी पडले. आता एक मोठी माहिती पुढे आलीये. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि आशा पवार हे दाम्पत्य देखील होते. दोघेजण आपल्या मुलाकडे लंडनला निघाले होते. त्यांचा मुलगा लंडनमध्ये असल्याने हे दोघे लेकाच्या भेटीसाठी जात होते.परंतु काळाने घाला घातला आणि ते दोघेही या अपघातात दगावले.


विमान अपघातानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडले. यावेळी हा विमान अपघात झाला, त्यावेळी विद्यार्थी जेवण करत होते. एअर इंडियाचे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी तर काहींचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १:३९ वाजता रनवे २३ वरून या विमानाने आकाशाकडे झेप घेतली.


उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३५ सेकंदामध्ये अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला आहे. पायलटने मेडे कॉल देखील केला होता. मात्र, लँडिंगच्या अगोदरच विमानाचा अपघात झाला. अमित शाह हे देखील अहमदाबादमध्ये पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात