शालेय पोषण आहाराचे कंत्राट कंपनीला देण्यास विरोध

  62

कर्मचारी महिलांचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


पालघर : जिल्हा परिषद, अनुदानित, आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार शिजवण्याचा कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सदर कंत्राट खाजगी कंपनीला देऊ नये या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.



विद्यार्थ्यांना सकस आणि ताजा पोषण आहार मिळावा तसेच स्थानिक गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून पोषण आहार शिजविण्याचे काम स्थानिक महिलांना देण्याचा नियम आहे. मात्र पालघर जिल्हा परिषदेने हा कंत्राट एका मोठ्या खाजगी कंपनीला देण्याबाबत पत्र काढले आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील पोषण आहार शिजवणाऱ्या जवळपास तीन हजार महिलांनी आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला.


पालघर जिल्हा परिषदेने आहार शिजवण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला आहे. असे झाले तर आहार शिजवणारे सर्व कर्मचारी बेरोजगार होतील तसेच मुलांना ताजा आहार मिळणे देखील बंद होईल. खाजगी कंपनी जो आहार शिजवेल तो पहाटे शिजवून गावात येईपर्यंत खराब होऊन पोषण मूल्य देखील शिल्लक राहत नाही.


त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका व कर्मचाऱ्यांना बेरोजगार करू नका अशी मागणी करत हजारो कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. या मागण्यांबाबतचे पत्र आमदार विनोद निकोले व शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सीट संलग्न)च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने

सुविधा, लाभकरांसाठी ‘मुहूर्त’ सापडेना !

नागरिकांमध्ये मात्र संभ्रम कायम विरार : वसई-विरार शहर पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका क्षेत्रात