शालेय पोषण आहाराचे कंत्राट कंपनीला देण्यास विरोध

कर्मचारी महिलांचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


पालघर : जिल्हा परिषद, अनुदानित, आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार शिजवण्याचा कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सदर कंत्राट खाजगी कंपनीला देऊ नये या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.



विद्यार्थ्यांना सकस आणि ताजा पोषण आहार मिळावा तसेच स्थानिक गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून पोषण आहार शिजविण्याचे काम स्थानिक महिलांना देण्याचा नियम आहे. मात्र पालघर जिल्हा परिषदेने हा कंत्राट एका मोठ्या खाजगी कंपनीला देण्याबाबत पत्र काढले आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील पोषण आहार शिजवणाऱ्या जवळपास तीन हजार महिलांनी आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला.


पालघर जिल्हा परिषदेने आहार शिजवण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला आहे. असे झाले तर आहार शिजवणारे सर्व कर्मचारी बेरोजगार होतील तसेच मुलांना ताजा आहार मिळणे देखील बंद होईल. खाजगी कंपनी जो आहार शिजवेल तो पहाटे शिजवून गावात येईपर्यंत खराब होऊन पोषण मूल्य देखील शिल्लक राहत नाही.


त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका व कर्मचाऱ्यांना बेरोजगार करू नका अशी मागणी करत हजारो कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. या मागण्यांबाबतचे पत्र आमदार विनोद निकोले व शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सीट संलग्न)च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या