साई मंदिरात आता हार-फुले नेता येणार

तदर्थ समितीचा निर्णय


शिर्डी : काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या साईनगरीत साईभक्तांना साई समाधी मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती मात्र गुरुवारी १२ जून रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुल, हार व प्रसाद बंदीचा निर्णय घेतला असून भाविकांची लूट थांबवण्याकरिता पूजेचे साहित्य खरेदी केल्याची पावती प्रवेश द्वारा जवळ दाखवल्यानंतरच साई भक्तांना फुल हार प्रसाद नेण्यास मंदिरात परवानगी मिळणार असल्याने या निर्णयाचे साई भक्त व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कोरोना काळात साई मंदिरात फुल हार व प्रसाद बंदी केल्यानंतर दोन ते तीन वर्ष शिर्डीतील फुल विक्रेते व परिसरातील फुल उत्पादक यांना आर्थिक वर्षाचा मोठा सामना करावा लागला होता.


हार- फुल व प्रसाद बंदी उठवण्याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांनी न्यायालयीन लढा उभारून साई मंदिरात फुल हार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवून फुल उत्पादक शेतकरी व फुल विक्रेते यांना मोठा आधार दिला होता. शिर्डीतील काही दुकानदार फुल हार व प्रसाद याची किमतीपेक्षा जादा दराने विक्री करून भाविकांची लूट करीत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर शिर्डीत ग्रामस्थांनी या दुकानदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला तसेच भाविकांची होणारी लूट थांबण्याकरिता डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील व्यवसायिकांची बैठक घेऊन त्यांना दुकानासमोर दर फरक लावण्याच्या सूचना केल्या होत्या.


याबाबत नगरपरिषदेला देखील सदर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. फुलहार प्रसाद अनेक वर्षानंतर सुरू होताच काही महिन्यातच काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बंदुकीच्या साह्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते.काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या विविध देश व राज्यातून भाविकांची सुरक्षाची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने साई मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास बंदी केली होती त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या पुन्हा खचला होता.


तसेच शिर्डीतील छोटे व्यवसायिक देखील फुल हार प्रसाद बंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडले होते.साई मंदिरात फुल हार व प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता.अखेर गुरुवारी १२ जून रोजी साईबाबा संस्थानच्या तथर्थ समितीने फुल हार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवण्याचा निर्णय घेऊन भाविकांची पूजेच्या साहित्यापासून होणारी लूट थांबवण्याकरिता साई मंदिरात भाविकांना पूजेचे साहित्य घेऊन जाण्यापूर्वी ज्या दुकानात पूजेचे साहित्य खरेदी केले त्या दुकानचे पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे बिल मंदिर प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच साई समाधी मंदिरात त्या भाविकाला फुल हार व प्रसाद नेण्यास प्रवेश दिला जाईल असा निर्णय घेतल्याने साई भक्तांकडून जादा दराने पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना या निर्णयाने चाप बसणार असून या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. साई संस्थांनी प्रथमच इतिहासात हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे भाविकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी