Local train: लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने प्रवाशाचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरूवातीला हा प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना फटीत अडकून मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र या घटनेची सत्यता समोर आली आहे.

संजय जगजप्पा मातंगे असं या प्रवाशाचं नाव आहे. संजय हे स्थानकात रेल्वेची वाट पाहत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते लोकलवर आदळले. यातच ते लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकले.

त्यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले मात्र ते अंत्यवस्थ अवस्थेत होते. त्यांच्या छातीवर दाब देत पंपिंगही करण्यात आले मात्र त्यांची हालचाल होत नव्हती. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाला होता.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य