मध्य रेल्वेच्या गाड्यांना सुधारित डब्यांची रचना

मुंबई : मध्य रेल्वे काही गाड्यांच्या सेवा सुधारित संरचनेसह चालवणार आहे.
ट्रेन क्रमांक १२२२३/१२२२४ लोकमान्य टिळक टर्मिनस-एरनाकुलम-दुरांतो एक्सप्रेस आता एक अतिरिक्त २ टियर वातानुकूलित आणि ३ टियर वातानुकूलित कोचसह चालेल.



१२२२३ लोकमान्य टिळक टर्मिनस-एरणाकुलम दुरांतो एक्सप्रेस १४ जूनपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून चालेल तर १२२२४ एरनाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस १५ जूनपासून एर्नाकुलम येथून चालेल. या गाडीला एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ७ तृतीय वातानुकूलित श्रेणी, ८ शयनयान, १ पॅन्ट्री कार आणि २ सामान/जनरेटर कम गार्ड ब्रेक व्हॅन. अशी रचना असेल.


ट्रेन क्रमांक १८०२९/१८०३० लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस आता एलएचबी कोचसह आणि २ अतिरिक्त जनरल सेकंड क्लास कोचसह चालेल. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस २१ जून पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून चालेल तर १८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १९. जून पासून शालिमार येथून चालेल या गाडीला २ द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ५ तृतीय वातानुकूलित श्रेणी, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, २ सामान/जनरेटरसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि ४ भाडेतत्त्वावर घेतलेल्या पार्सल व्हॅन. असे डब्बे असतील .


ट्रेन क्रमांक १७६११/ १७६१२ नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्सप्रेस आता १ अतिरिक्त ३ टियर वातानुकूलित कोच आणि २ अतिरिक्त शयनयान कोचसह चालेल. १७६११ हजूर साहिब नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ४ ऑगस्टपासून हजूर साहिब नांदेड येथून चालेल तर १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस ५ ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चालेल. या गाडीला एक वातानुकूलित फर्स्ट क्लास कम वातानुकूलित २ टियर, एक द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ३ तृतीय वातानुकूलित श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.असे डब्बे असतील.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,