
मुंबई: विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री (LBS) मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी (Eastern Express Highway) जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ६१५ मीटर लांबीचा पूल मुंबई महानगरपालिकेने (BMC) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळ्यात LBS मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेता, कोणत्याही अधिकृत उद्घाटनाची वाट न पाहता हा पूल मुंबईकरांसाठी तातडीने खुला करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसे आदेशही त्यांनी दिले आहेत.

प्रतिनिधी: बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कॅनरा बँक यांनी आपल्या व्याजदरात ०.५०% बीपीएस पूर्णांकांने कपात केली आहे व अनेक बँकांनी आपल्या कर्ज व्याजदरात ...
या पुलाच्या कामाचे आदेश २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या पुलासाठी १०४.७७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
पुढील काळात पावसाळा सुरू होत असल्याने मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा पूल शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. या नव्या पुलामुळे विक्रोळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.