एमआयडीसी निवासी भागातील नवीन काँक्रीट रस्ते तोडणे सुरूच

  35

गेल्या वर्षभरात अंदाजे ३० ठिकाणी रस्ते तोडले


कल्याण : एमआयडीसी निवासी मध्ये नवीन बनवलेले काँक्रीट रस्ते एका मागोमाग तोडणे सुरूच आहे. महावितरणची भूमिगत मेन केबल ही नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील सोनाक्षी सोसायटी समोर नादुरुस्त झाल्याने रस्ता तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र यावेळी सदर रस्ता तोडण्याची वेळ रात्री दहाच्याआसपास घेतली होती. कारण असे काँक्रीट रस्ते तोडताना लोकांचा विरोध होत असल्याने तसेच हा एमआयडीसी मधील महत्त्वाचा वर्दळीचा मुख्य रस्ता असल्याने तो रात्री तोडण्याचा निर्णय घेतला असावा.



बुधवारी रात्री अचानक जेसीबी सहित आठ, दहा जण येऊन रस्ता तोडण्यास सुरवात केली गेली. त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी लगेच तेथे नवीन केबल टाकून घेतली आहे. हा एमआयडीसी मधील मुख्य रस्ता तोडला गेल्याने येथील नागरिकांनी आपला राग समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केला आहे. यात महावितरणची कोणतीही चूक दिसत नाही कारण लोकांचा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एमएमआरडीएकडून नवीन काँक्रीट रस्ते बनविताना भूमिगत वीज केबल रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी महावितरणला अवधी दिला गेला नाही.

एमआयडीसी मधील नवीन काँक्रीट रस्ते बनविल्यापासून गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ अनेक रस्ते हे विविध वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तोडले जात आहेत. परंतु ते रस्ते पुन्हा दुरूस्त किंवा पूर्वीप्रमाणे ठीकठाक करण्यात आले नाहीत. गेल्या वर्षभरात एमआयडीसी निवासी मध्ये असे रस्ते तोडण्याची संख्या अंदाजे ३०आसपास झाली आहे. त्यामुळे जनतेचा पैशाचा अपव्यय होत आहे. जनतेचे सेवक, प्रतिनिधी हे सर्व आता चुपचाप पाहत आहेत. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला येथील विविध समस्यांचा त्रागा जनता त्यांच्यासमोर मांडून जाब विचारेल यात शंका नाही. असे मत यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त
केले आहे.
Comments
Add Comment

युरोपमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जोडप्यांना लुटले, ठाण्यातून दोन महिलांना अटक

ठाणे: ठाण्यातील दोन महिलांना युरोपमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील एका जोडप्याची ५ लाख

ठाणे महापालिका क्षेत्रात राबवणार ‘अतिसार थांबवा’ मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ‘अतिसार

शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची पाहणी

आयुक्त सौरभ राव यांनी यंत्रणांना दिले सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे  : पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी

धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार

कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून करावे लागते काम ठाणे : परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक

भिवंडीत १६,१७ जूनला पाणीपुरवठा बंद

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविण्यांत येते की, स्टेम वॉटर डिस्ट्री,

शहापुरातील शेतकऱ्यांना तीन महिने पैसे नाहीत

शेतकरी आर्थिक संकटात शहापूर : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारण,