पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करणाऱ्या अर्जुनचा अपघाती मृत्यू

  82

अहमदाबाद: अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे सुपुत्र अर्जुनभाई मनूभाई पटोलिया यांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिच्या अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीसाठी लंडनहून वाडिया येथे आलेले अर्जुनभाई लंडनला परत जात असतानाच काळाने त्यांना गाठले. या हृदयद्रावक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.


अर्जुनभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते आणि गेली काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते. पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी विसर्जनासाठी आणि दशक्रिया विधीसाठी ते आपल्या गावी वाडिया येथे आले होते. १२ जून २०२५ रोजी ते एअर इंडियाच्या AI171 विमानाने लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.


सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. हा अपघात अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ घडला. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा, तर जमिनीवरील २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातातून केवळ एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह १६८ भारतीय, ५२ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाच्या नागरिकाचा समावेश आहे.


या दुर्घटनेत अर्जुनभाई पटोलिया यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी त्यांची दोन मुले आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मेघाणीनगर परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने अहमदाबादसह संपूर्ण गुजरात हादरले आहे.


अर्जुनभाईंच्या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना सतावत आहे. वाडिया गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Ahmedabad plane crash : विमान अपघातात आतापर्यंत २७० मृतदेह आढळले, ७ जणांची ओळख पटवण्यात यश

अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आज, शुक्रवारी घटनास्थळाहून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह आढळून आलेत.

AI 171 Crash नंतर डीजीसीएचा मोठा निर्णय, एअर इंडियाच्या सर्व बोईंग ड्रीमलाइनर विमानांची कडक सुरक्षा तपासणी होणार

अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान AI171 च्या भयानक अपघातानंतर डीजीसीए (DGCA) द्वारे एक मोठा निर्णय

Ahmedabad plane crash: दोन दिवस आधी झाले होते लग्न, विमान अपघातात पुसले गेले कुंकू

अहमदाबाद: वडोदरा शहराच्या वाडी परिसरात राहणाऱ्या महेश्वरी कुटुंबातील घरात दोन दिवस आधी लग्नाचा आनंद होता.

Air India Plane Crash : DNA चाचणीतून मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू; मुख्य वैमानिकाच्या घरी नमुना घेण्यासाठी पोहोचले सरकारी कर्मचारी

मुंबई : एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचण्या करण्याचा

Air India Plane Crash Analysis: "अयोग्य फ्लॅप सेटिंगमुळे विमानाची लिफ्ट चुकली" एव्हिएशन तज्ञ कॅप्टन स्टीव्हनी केले AI-171 क्रॅशचे विश्लेषण

एआय १७१ चा अपघात इंजिन बिघाडामुळे नसून त्याला अनेक कारणे जबाबदार नवी दिल्ली: विमान वाहतूक तज्ज्ञ आणि अनुभवी

पठाणकोटजवळ अपाचे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

पठाणकोट : भारतीय हवाई दलाच्या (IAF) अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरने पंजाबमधील पठाणकोटजवळ खबरदारी म्हणून आपत्कालीन लँडिंग