पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करणाऱ्या अर्जुनचा अपघाती मृत्यू

  104

अहमदाबाद: अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे सुपुत्र अर्जुनभाई मनूभाई पटोलिया यांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिच्या अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीसाठी लंडनहून वाडिया येथे आलेले अर्जुनभाई लंडनला परत जात असतानाच काळाने त्यांना गाठले. या हृदयद्रावक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.


अर्जुनभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते आणि गेली काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते. पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी विसर्जनासाठी आणि दशक्रिया विधीसाठी ते आपल्या गावी वाडिया येथे आले होते. १२ जून २०२५ रोजी ते एअर इंडियाच्या AI171 विमानाने लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.


सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. हा अपघात अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ घडला. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा, तर जमिनीवरील २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातातून केवळ एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह १६८ भारतीय, ५२ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाच्या नागरिकाचा समावेश आहे.


या दुर्घटनेत अर्जुनभाई पटोलिया यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी त्यांची दोन मुले आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मेघाणीनगर परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने अहमदाबादसह संपूर्ण गुजरात हादरले आहे.


अर्जुनभाईंच्या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना सतावत आहे. वाडिया गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी