पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करणाऱ्या अर्जुनचा अपघाती मृत्यू

अहमदाबाद: अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे सुपुत्र अर्जुनभाई मनूभाई पटोलिया यांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिच्या अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीसाठी लंडनहून वाडिया येथे आलेले अर्जुनभाई लंडनला परत जात असतानाच काळाने त्यांना गाठले. या हृदयद्रावक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.


अर्जुनभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते आणि गेली काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते. पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी विसर्जनासाठी आणि दशक्रिया विधीसाठी ते आपल्या गावी वाडिया येथे आले होते. १२ जून २०२५ रोजी ते एअर इंडियाच्या AI171 विमानाने लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.


सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. हा अपघात अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ घडला. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा, तर जमिनीवरील २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातातून केवळ एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह १६८ भारतीय, ५२ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाच्या नागरिकाचा समावेश आहे.


या दुर्घटनेत अर्जुनभाई पटोलिया यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी त्यांची दोन मुले आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मेघाणीनगर परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने अहमदाबादसह संपूर्ण गुजरात हादरले आहे.


अर्जुनभाईंच्या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना सतावत आहे. वाडिया गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर