पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करणाऱ्या अर्जुनचा अपघाती मृत्यू

अहमदाबाद: अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे सुपुत्र अर्जुनभाई मनूभाई पटोलिया यांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिच्या अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीसाठी लंडनहून वाडिया येथे आलेले अर्जुनभाई लंडनला परत जात असतानाच काळाने त्यांना गाठले. या हृदयद्रावक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.


अर्जुनभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते आणि गेली काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते. पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी विसर्जनासाठी आणि दशक्रिया विधीसाठी ते आपल्या गावी वाडिया येथे आले होते. १२ जून २०२५ रोजी ते एअर इंडियाच्या AI171 विमानाने लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.


सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. हा अपघात अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ घडला. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा, तर जमिनीवरील २४ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातातून केवळ एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह १६८ भारतीय, ५२ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाच्या नागरिकाचा समावेश आहे.


या दुर्घटनेत अर्जुनभाई पटोलिया यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी त्यांची दोन मुले आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मेघाणीनगर परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने अहमदाबादसह संपूर्ण गुजरात हादरले आहे.


अर्जुनभाईंच्या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना सतावत आहे. वाडिया गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे