Air India Plane Crash : DNA चाचणीतून मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू; मुख्य वैमानिकाच्या घरी नमुना घेण्यासाठी पोहोचले सरकारी कर्मचारी

मुंबई : एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचण्या करण्याचा निर्णय अधिकृतरीत्या घेण्यात आला आहे. अपघात इतका भीषण होता की अनेक मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे आहेत. त्यामुळे नातेवाईकांची अधिकृत ओळख आणि मृतांचे अवशेष सुपूर्त करण्यासाठी DNA तंत्राचा वापर करण्याची गरज भासली आहे.


या प्रक्रियेची सुरुवात मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या कुटुंबीयांपासून करण्यात आली आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सरकारी वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची टीम पोहोचली असून, DNA नमुने घेण्यात आले आहेत. याचप्रमाणे इतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून हळूहळू ही प्रक्रिया विस्तारित केली जाईल.


वैद्यकीय सूत्रांनुसार, DNA मॅचिंग ही अत्यंत काटेकोर आणि वेळखाऊ प्रक्रिया असली, तरी तीच सध्या मृतांची अचूक ओळख पटवण्यासाठी सर्वात विश्वसनीय माध्यम आहे. सरकारी यंत्रणांनी मृतांच्या कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सर्व माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की, मृतांची अधिकृत यादी फक्त DNA चाचणी पूर्ण झाल्यानंतरच प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे अनेक कुटुंबीय सध्या प्रतीक्षेत आहेत.


एअर इंडिया AI-171 अपघातात २४२ जण होते, त्यातील २०० पेक्षा अधिकांचा मृत्यू झाला असून केवळ एकच प्रवासी बचावला आहे. सरकारी पातळीवर या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने