Ahmedabad plane crash: विमान अपघातातील मृतांचा आकडा २५६वर

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक येथे जात असलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान AI-171 गुरूवारी टेक ऑफ करतात लगेचच क्रॅश झाले. आतापर्यंत या अपघातात २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. डेप्युटी कमिशनर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ लोक होते.


रडार डेटाच्या माहितीनुसार विमानाने दुपारी १.३९ मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. मात्र समुद्रतळापासून ६२५ फूटच्या उंचीवर पोहोचल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड आला आणि त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते.



विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू


गुरूवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान क्रॅश झाले आणि मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चारही बाजूंनी धुराचे लोळ आणि मलबा पसरला होता. एकच हल्लाकल्लोळ झाला.


विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात २६५ मृतदेह आणण्यात आले. मृतांमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.



एक प्रवासी सुखरूप


विमान दुर्घटनेत एक प्रवासी सुखरूप असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वास कुमार आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम