Ahmedabad plane crash: विमान अपघातातील मृतांचा आकडा २५६वर

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक येथे जात असलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान AI-171 गुरूवारी टेक ऑफ करतात लगेचच क्रॅश झाले. आतापर्यंत या अपघातात २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. डेप्युटी कमिशनर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ लोक होते.


रडार डेटाच्या माहितीनुसार विमानाने दुपारी १.३९ मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. मात्र समुद्रतळापासून ६२५ फूटच्या उंचीवर पोहोचल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड आला आणि त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते.



विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू


गुरूवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान क्रॅश झाले आणि मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चारही बाजूंनी धुराचे लोळ आणि मलबा पसरला होता. एकच हल्लाकल्लोळ झाला.


विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात २६५ मृतदेह आणण्यात आले. मृतांमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.



एक प्रवासी सुखरूप


विमान दुर्घटनेत एक प्रवासी सुखरूप असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वास कुमार आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.