Ahmedabad plane crash : विमान अपघातात आतापर्यंत २७० मृतदेह आढळले, ७ जणांची ओळख पटवण्यात यश

अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आज, शुक्रवारी घटनास्थळाहून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह आढळून आलेत. यामध्ये विमानाचे प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा समावेश आहे. यापैकी ७ मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांना सोपवण्यात आले. परंतु, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.


अपघातग्रस्त विमानामध्ये २४२ प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. यामुळे सुमारे २४१ प्रवासी आणि हॉस्टेलमधील डॉक्टर्स असे एकूण २७० मृतदेह आहेत. परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये ५० हून अधिक लोक होते, असे सांगितले गेले आहे. जसेजसे मृतांचे नातेवाईक पोहोचले आहेत, तसे डीएनए टेस्ट केले जात आहेत. परदेशातील प्रवाशांचे देखील नातेवाईक अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचेही डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटण्याची अपेक्षा आहे. यानंतर मृतांचा खरा अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे.


सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७० हून अधिक मृतदेहांचे पोस्टमार्टेम झाले आहे. यापैकी २२० मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. ७ मृतदेहांची ओळख पटली आहे. विमान अपघात प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विमान अपघात तपास ब्युरोसह (एएआयबी) ८ एजन्सींनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामध्ये युकेची अपघात चौकशी शाखा (युके-एएआयबी), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएसबी), फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील