Ahmedabad plane crash : विमान अपघातात आतापर्यंत २७० मृतदेह आढळले, ७ जणांची ओळख पटवण्यात यश

अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आज, शुक्रवारी घटनास्थळाहून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह आढळून आलेत. यामध्ये विमानाचे प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा समावेश आहे. यापैकी ७ मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांना सोपवण्यात आले. परंतु, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.


अपघातग्रस्त विमानामध्ये २४२ प्रवासी होते. त्यापैकी एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. यामुळे सुमारे २४१ प्रवासी आणि हॉस्टेलमधील डॉक्टर्स असे एकूण २७० मृतदेह आहेत. परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये ५० हून अधिक लोक होते, असे सांगितले गेले आहे. जसेजसे मृतांचे नातेवाईक पोहोचले आहेत, तसे डीएनए टेस्ट केले जात आहेत. परदेशातील प्रवाशांचे देखील नातेवाईक अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचेही डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटण्याची अपेक्षा आहे. यानंतर मृतांचा खरा अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे.


सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७० हून अधिक मृतदेहांचे पोस्टमार्टेम झाले आहे. यापैकी २२० मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. ७ मृतदेहांची ओळख पटली आहे. विमान अपघात प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विमान अपघात तपास ब्युरोसह (एएआयबी) ८ एजन्सींनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामध्ये युकेची अपघात चौकशी शाखा (युके-एएआयबी), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएसबी), फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.