विमान अपघातात १५ वर्षीय आकाशचा मृत्यू, आई गंभीर जखमी

अहमदाबाद : अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एअर इंडिया AI 171 हे विमान लंडनसाठी उड्डाण घेताच अवघ्या एका मिनिटात कोसळले आणि या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात क्रू आणि प्रवासी मिळून विमानातील २४१ जणांचा आणि हॉस्टेल परिसरातील काही नागरिकांचा समावेश आहे. दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. तसेच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.


विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. अपघाताच्या वेळी आकाश आपल्या आईसोबत दुकानात होता. विमानाचे काही तुकडे थेट त्यांच्या चहाच्या गाड्यावर येऊन कोसळले. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई रेखा यादव या गंभीर जखमी झाली आहे. रेखा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या