विमान अपघातात १५ वर्षीय आकाशचा मृत्यू, आई गंभीर जखमी

अहमदाबाद : अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एअर इंडिया AI 171 हे विमान लंडनसाठी उड्डाण घेताच अवघ्या एका मिनिटात कोसळले आणि या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात क्रू आणि प्रवासी मिळून विमानातील २४१ जणांचा आणि हॉस्टेल परिसरातील काही नागरिकांचा समावेश आहे. दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. तसेच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.


विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. अपघाताच्या वेळी आकाश आपल्या आईसोबत दुकानात होता. विमानाचे काही तुकडे थेट त्यांच्या चहाच्या गाड्यावर येऊन कोसळले. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई रेखा यादव या गंभीर जखमी झाली आहे. रेखा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे