विमान अपघातात १५ वर्षीय आकाशचा मृत्यू, आई गंभीर जखमी

अहमदाबाद : अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एअर इंडिया AI 171 हे विमान लंडनसाठी उड्डाण घेताच अवघ्या एका मिनिटात कोसळले आणि या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात क्रू आणि प्रवासी मिळून विमानातील २४१ जणांचा आणि हॉस्टेल परिसरातील काही नागरिकांचा समावेश आहे. दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. तसेच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.


विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. अपघाताच्या वेळी आकाश आपल्या आईसोबत दुकानात होता. विमानाचे काही तुकडे थेट त्यांच्या चहाच्या गाड्यावर येऊन कोसळले. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई रेखा यादव या गंभीर जखमी झाली आहे. रेखा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली