विमान अपघातात १५ वर्षीय आकाशचा मृत्यू, आई गंभीर जखमी

अहमदाबाद : अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एअर इंडिया AI 171 हे विमान लंडनसाठी उड्डाण घेताच अवघ्या एका मिनिटात कोसळले आणि या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात क्रू आणि प्रवासी मिळून विमानातील २४१ जणांचा आणि हॉस्टेल परिसरातील काही नागरिकांचा समावेश आहे. दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. तसेच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.


विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेचा फटका बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बाहेर चहा विकणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव व त्याच्या आईला बसला. अपघाताच्या वेळी आकाश आपल्या आईसोबत दुकानात होता. विमानाचे काही तुकडे थेट त्यांच्या चहाच्या गाड्यावर येऊन कोसळले. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई रेखा यादव या गंभीर जखमी झाली आहे. रेखा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या