व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत नागालँडमधून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांकडून अपहृत व्यावसायिकाची सुटका केली असून आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईत आणले जात आहे.


व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून समांतर तपास सुरू केला. खंडणीसाठी आलेल्या फोन कॉल्सचं विश्लेषण केलं असता ते नागालँडहून होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचं पथक नागालँडकडे रवाना करण्यात आलं आणि तिथून तिघांना अटक करण्यात आली.


या आरोपींनी चौकशीत सांगितले की, अपहृत व्यावसायिकाने एका व्यवसाय करारात त्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती आणि त्या प्रकरणाची तक्रारही नागालँडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी या दाव्यांची पडताळणी सुरू केली आहे.


अटक करण्यात आलेले तिघे नागालँडमधील स्थानिक रहिवासी असून, त्यांच्या अटकेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपींना विमानतळावर आणून मुंबईकडे रवाना केलं.


या प्रकरणात खंडणी मागण्याच्या गंभीर आरोपांबरोबरच व्यावसायिकाविरुद्धही काही दावे समोर येत असून, पोलिसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला