व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत नागालँडमधून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांकडून अपहृत व्यावसायिकाची सुटका केली असून आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईत आणले जात आहे.


व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून समांतर तपास सुरू केला. खंडणीसाठी आलेल्या फोन कॉल्सचं विश्लेषण केलं असता ते नागालँडहून होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचं पथक नागालँडकडे रवाना करण्यात आलं आणि तिथून तिघांना अटक करण्यात आली.


या आरोपींनी चौकशीत सांगितले की, अपहृत व्यावसायिकाने एका व्यवसाय करारात त्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती आणि त्या प्रकरणाची तक्रारही नागालँडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी या दाव्यांची पडताळणी सुरू केली आहे.


अटक करण्यात आलेले तिघे नागालँडमधील स्थानिक रहिवासी असून, त्यांच्या अटकेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपींना विमानतळावर आणून मुंबईकडे रवाना केलं.


या प्रकरणात खंडणी मागण्याच्या गंभीर आरोपांबरोबरच व्यावसायिकाविरुद्धही काही दावे समोर येत असून, पोलिसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल

मुंबई : हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार

मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत

'पल्स' मुळे आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

मुंबई : सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे

द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी तासगाव व नाशिक येथे विशेष केंद्रांच्या मागणीचा सकारात्मक

मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात

बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू

पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर मिळणार न्याय

मुंबई : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांना