व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

  61

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत नागालँडमधून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांकडून अपहृत व्यावसायिकाची सुटका केली असून आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईत आणले जात आहे.


व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून समांतर तपास सुरू केला. खंडणीसाठी आलेल्या फोन कॉल्सचं विश्लेषण केलं असता ते नागालँडहून होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचं पथक नागालँडकडे रवाना करण्यात आलं आणि तिथून तिघांना अटक करण्यात आली.


या आरोपींनी चौकशीत सांगितले की, अपहृत व्यावसायिकाने एका व्यवसाय करारात त्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती आणि त्या प्रकरणाची तक्रारही नागालँडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी या दाव्यांची पडताळणी सुरू केली आहे.


अटक करण्यात आलेले तिघे नागालँडमधील स्थानिक रहिवासी असून, त्यांच्या अटकेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपींना विमानतळावर आणून मुंबईकडे रवाना केलं.


या प्रकरणात खंडणी मागण्याच्या गंभीर आरोपांबरोबरच व्यावसायिकाविरुद्धही काही दावे समोर येत असून, पोलिसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना