विरारमध्ये फक्त ७०० जाहिरात फलक अधिकृत

  88

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्ते, बाजारपेठा वेगवेगळ्या जाहिरातींच्या फलकाने गजबजलेले दिसत असले तरी, महापालिकेकडून परवानगी घेऊन लागलेले केवळ ७३४ फलकच यामध्ये आहेत. त्यामुळे जाहिरात विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी ९ प्रभाग समित्यांना पत्र देऊन, अनधिकृत फलकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.


वसई-विरार महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाच्या जाहिरात विभागाकडून परवानगी दिली जाते. जाहिरात फलकाची साईज, फलक लावण्याचा कालावधी, ठिकाण अशा अनेक बाबींवर आधारित प्रति चौरस मीटरचा दर आकारून अशी परवानगी दिली जाते. महापालिकेची परवानगी न घेता, शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद नियमात आहे.


दरम्यान, वसई विरार महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. लाखोंची लोकसंख्या असलेल्या या कार्यक्षेत्रात विविध नामांकित कंपन्यांची जाहिरात फलक लावण्यासाठी चढाओढ असते. त्याचप्रमाणे विविध छोट्यामोठ्या बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर जाहिरात फलक लावण्यासाठी जाहिरातदारांची नेहमीच गर्दी असते. मात्र महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांचा आकडा मोठा असल्याचे शहरात दिसत असलेले जाहिरात फलक आणि महापालिकेकडून घेण्यात आलेल्या परवानगीवरुन दिसून येते.


दरम्यान, महापालिकेचे जाहिरात विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी ९ प्रभाग समिती सहायक आयुक्तांना प्रभागातील अधिकृत जाहिरात फलकांची यादी पाठवून त्या यादीनुसार अनधिकृत जाहिरात फलक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अनाधिकृत जाहिरात फलकांच्या माहितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर