आजच्याच दिवशी ७५ वर्षांपूर्वी झाला होता मोठा विमान अपघात, समुद्रात पडले होते विमान

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्टजवळ विमान अपघाताच्या ठिकाणी धुराचे लोळ आणि अपघाताची दृश्ये ही हृदय हेलावून टाकणारी आहेत. अहमदाबाद येथून लंडन जात असलेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते. यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. या अपघातात एक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले आहे तर मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.


अहमदाबादमध्ये आज म्हणजेच १२ जून २०२५ला अहमदाबाद येथून लंडनला जात असलेल्या प्लेन टेक ऑफ सोबत क्रॅश झाले. या भीषण विमान अपघाताने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. आजपासून ७५ वर्षांआधी म्हणजेच १२ जून १९५०च्या जवळ भारतापासून ३ हजार किमी दूर असाच एक विमान अपघात घडला होता.


एअर फ्रान्सचे एक विमान डगलस डीसी ४ विमान बहरीन विमानतळावर लँड करत असताना समुद्रात जाऊन पडले. या अपघातात ४६ लोक मारले गेले होते. एअर फ्रान्सचे विमान सायगॉन येथून पॅरिसच्या दिशेने जात होते. यातच पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवर विमान थांबले होते. विमानने संध्याकाळी ४ वाजता पाकिस्तानच्या बहरीन येथेून उड्डाण केले.


रात्री ९ वाजता साधारण विमानाने बहरीन एप्रोच कंट्रोलला फोन करून त्याची उंची ६५०० फूट सांगितली आणि उतरण्याची परवानगी मागितली. एप्रोच कंट्रोलने २००० फूट खाली उतरण्यास परवानगी दिली. यानंतर विमान हवाई क्षेत्रापासून वर साधारण १००० फूट उंचावर आले. विमानाला आपली स्थिती पाहता पुन्हा उतरण्याची सूचना देण्यात आली. टॉवर कंट्रोलने स्वीकार केले आणि रनवेवर उतरण्याची परवानगी दिली.



समुद्रात लँड झाले विमान


यानंतर एअर फ्रान्सचे विमान समुद्रात पाण्याला टक्कर देत अपघातग्रस्त झाले. एअर फ्रान्स डगलस डीसी ४ विमान बहरीन विमानतळाच्या जवळील समुद्रात पडले. यात ४६ जणांचा मृत्यू झाला. केवळ ६ जण यातून बचावले.

Comments
Add Comment

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची