चमत्कार, Air India अपघातातून सीट 11A वरील प्रवासी वाचला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी Air India च्या बोईंग 787-8 Dreamliner विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला असला तरी, सीट क्रमांक 11A वर बसलेले रमेश विश्वासकुमार (४०) हे एकमेव वाचलेले प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.


रमेश यांनी सांगितले की, टेकऑफनंतर अवघ्या ३० सेकंदांत मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं. सगळं इतक्या झपाट्याने घडलं की काहीच कळायच्या आत मी धडकलो. डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला मृतदेह होते, मी घाबरलो. मी उठलो आणि धावत सुटलो. कुणीतरी मला उचलून रुग्णवाहिकेत टाकलं आणि इथे रुग्णालयात आणलं.



छाती, डोळे आणि पायांवर गंभीर दुखापत झाली असली तरी रमेश सुरक्षित आहेत. ते सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (४५) हेही त्याच विमानात होते, पण ते वेगळ्या सीटवर बसले होते. आम्ही दोघं काही दिवस भारतात होतो. दिव येथे गेलो होतो. अपघातानंतर अजूनही माझा भाऊ सापडलेला नाही. कृपया त्याचा शोध घ्या, अशी भावनिक विनंती त्यांनी केली.


विमानात एकूण २४२ जण होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होता. विमानाने दुपारी १.३९ वाजता झेप घेतली होती आणि काही मिनिटांतच ते कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं.


दुसरीकडे, रुग्णालयात अनेक प्रवाशांच्या नातेवाईकांनी आपल्या प्रियजनांचा शोध सुरू ठेवला आहे. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. त्यांचे माजी सहकारी शैलेश मंडलिया यांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली आणि सांगितलं, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. काही माहिती मिळाल्यास कळवा. हा अपघात अत्यंत भीषण होता आणि या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचलेले काही मोजके प्रवासीच आता संपूर्ण घटनेचा जिवंत साक्षीदार आहेत.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर