अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. सरकारने या निर्णयावर स्पष्टीकरण देण्याऐवजी शुद्धीपत्रक काढण्यास नकार दिल्यानंतर, न्यायालयाने यावर अंतरिम स्थगिती देत हे आरक्षण सध्या लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले.


हा आदेश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिला. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये न्यायालयाला तथ्य आढळले. न्यायालयाने स्पष्ट केले की, अल्पसंख्याक संस्थांवर सामाजिक आरक्षण लादणे कायद्याच्या विरोधात आहे, आणि याबाबत यापूर्वीही न्यायालयाने भूमिका मांडली होती.


या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षण विभागाने ६ मे रोजीचा आदेश काढून अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील उर्वरित (शिल्लक) जागांवर सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला काही अल्पसंख्याक संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या सुनावण्यांमध्ये न्यायालयाने सरकारला विचारलं की, हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला आणि तो मागे घेण्यासाठी काय भूमिका आहे?


सरकारी वकीलांनी याबाबत अधिक माहिती घ्यावी लागेल असं सांगितल्यावर, न्यायालयाने सरकारच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. शुद्धीपत्रक मागे घेणे फार कठीण काम नाही, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.


अखेर, याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादांवर विचार करून आणि सरकारच्या अपूर्ण उत्तराच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने सदर सामाजिक आरक्षणाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली.


न्यायालयीन अंतिम निर्णय येईपर्यंत अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये सामाजिक आरक्षण लागू होणार नाही.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे