अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. सरकारने या निर्णयावर स्पष्टीकरण देण्याऐवजी शुद्धीपत्रक काढण्यास नकार दिल्यानंतर, न्यायालयाने यावर अंतरिम स्थगिती देत हे आरक्षण सध्या लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले.


हा आदेश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिला. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये न्यायालयाला तथ्य आढळले. न्यायालयाने स्पष्ट केले की, अल्पसंख्याक संस्थांवर सामाजिक आरक्षण लादणे कायद्याच्या विरोधात आहे, आणि याबाबत यापूर्वीही न्यायालयाने भूमिका मांडली होती.


या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षण विभागाने ६ मे रोजीचा आदेश काढून अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील उर्वरित (शिल्लक) जागांवर सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला काही अल्पसंख्याक संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या सुनावण्यांमध्ये न्यायालयाने सरकारला विचारलं की, हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला आणि तो मागे घेण्यासाठी काय भूमिका आहे?


सरकारी वकीलांनी याबाबत अधिक माहिती घ्यावी लागेल असं सांगितल्यावर, न्यायालयाने सरकारच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. शुद्धीपत्रक मागे घेणे फार कठीण काम नाही, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.


अखेर, याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादांवर विचार करून आणि सरकारच्या अपूर्ण उत्तराच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने सदर सामाजिक आरक्षणाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली.


न्यायालयीन अंतिम निर्णय येईपर्यंत अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये सामाजिक आरक्षण लागू होणार नाही.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही