शहापुरातील शेतकऱ्यांना तीन महिने पैसे नाहीत

शेतकरी आर्थिक संकटात


शहापूर : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारण, त्यांनी शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर धान्यविक्री करून दोन ते तीन महिने उलटले असतानाही त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.


यावर्षी शासनाने धान्याला हमीभाव देत बोनसचीही घोषणा केली होती, त्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपले भात पोहोचवले. परंतु या खरेदी प्रक्रियेनंतरही तब्बल १ हजार ५०० शेतकऱ्यांना ना मूळ विक्री रक्कम मिळाली आहे, ना बोनस.


परिणामी बियाणे, खते, मशागत यांसाठी लागणारा खर्च करणे शेतकऱ्यांना अशक्य होत चालले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, खात्रीशीर उत्पन्नाच्या अभावी आणि थकीत रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अडचणीत आणणारी झाली आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेणे, बियाणे खरेदी करणे, खते मिळवणे यासाठी पैशांची नितांत गरज आहे. पण बँकांच्या दारात फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शासनाने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.


हमीभाव २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून बाजार भावाच्या तुलनेत हा पर्याय नक्कीच चांगला वाटतो. पण जेव्हा मूळ विक्री रक्कमच शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस फक्त कागदावरच उरतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या हाती केव्हा पडणार, याचा काही अंदाज नसल्याचे ॲड. प्रशांत घोडविंदे यांनी सांगितले.


लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी आणि बोनसही वितरित करावा. अन्यथा खरिपाची तयारी करणे कठीण होईल आणि शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर जाईल. यावर्षी हवामान बदलामुळे आधीच पीक नुकसान झाले आहे, त्यात शासन वेळेवर पैसे देत नसेल, तर शेतकऱ्यांचा शासनावरचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे, असे भात उत्पादक शेतकरी भगवान सांबरे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील

TET Paper Leaked : शिक्षक भरतीला पुन्हा धक्का! परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर लीक, उद्याची परीक्षा तात्पुरती स्थगित

ठाणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची

Dombivli Shardul Vichare : डोंबिवलीच्या शार्दुलने CA इंटरमीडिएटमध्ये देशात पटकावला पहिला क्रमांक

डोंबिवली : डोंबिवलीतून अभिमानाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre)

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)