अहमदाबाद : शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ


अहमदाबाद : गुजरातच्या अहमादाबाद येथे आज, गुरुवारी एअर इंडियाचे विमान बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ झाला. यावेळी वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.


एअर इंडियाचे विमान हॉस्टेलवर कोसळल्यामुळे १५ ते २० शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य किंवा आकडा जारी करण्यात आलेला नाही. परंतु, अपघातानंतर इमारतीला आग लागल्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


यासंदर्भात एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या माळ्याहून खाली उडी मारली. यात त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अजूनपर्यंत मुलाला भेटता आले नसून त्याच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे त्याच्या आईने स्पष्ट केले. दरम्यान बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमानाचा काही भाग हॉस्टेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला धडकला. यात इमारतीचे भीषण नुकसान झाले असून इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे का याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.