अहमदाबाद : शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ


अहमदाबाद : गुजरातच्या अहमादाबाद येथे आज, गुरुवारी एअर इंडियाचे विमान बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ झाला. यावेळी वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.


एअर इंडियाचे विमान हॉस्टेलवर कोसळल्यामुळे १५ ते २० शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य किंवा आकडा जारी करण्यात आलेला नाही. परंतु, अपघातानंतर इमारतीला आग लागल्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


यासंदर्भात एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या माळ्याहून खाली उडी मारली. यात त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अजूनपर्यंत मुलाला भेटता आले नसून त्याच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे त्याच्या आईने स्पष्ट केले. दरम्यान बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमानाचा काही भाग हॉस्टेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला धडकला. यात इमारतीचे भीषण नुकसान झाले असून इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे का याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: