Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, सुरक्षित आहेत का? सोशल मीडियावर तिकीट व्हायरल

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं लंडनला जाणारं AI-171 हे विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात एकूण २४२ प्रवासी, त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.



या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते, अशी माहिती पुढे आली आहे. ते विमानाच्या दुसऱ्या रांगेत बसले होते आणि त्यांचं तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.



पण... विजय रुपाणी सुरक्षित आहेत का?


दुर्दैवाने, विजय रुपाणी यांच्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि गुजरातच्या राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.



मदतकार्य युद्धपातळीवर


विमान कोसळताच मेघानीनगर परिसरात भीषण स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. नागरिक, वैद्यकीय पथकं, पोलीस आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी तातडीने तैनात करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या गाडीवर भीषण हल्ला; दोन जवान शहीद, पाच जखमी

इंफाळ, मणिपूर: मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर २०२५) सायंकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आसाम

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या गुजरातमध्ये ३४,२०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी २० सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान, ते

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा