रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदाला धोका?

  87

मुंबई: रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना त्याच्या चाहत्यांना मैदानावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईलं असं वाटत होतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने अशी कुठलीही घोषणा केली नाही.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यांनी २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपदही पटकावलं होतं. रोहितकडे वनडे क्रिकेटमधील विश्वचषक ट्रॉफी नाही. २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली तो भारतासाठी ही ट्रॉफी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तो यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत रोहितचे लक्ष्य २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे.


सध्या भारतीय संघात अनेक बदल होताना दिसत आहेत. विराट कोहली आणि रोहित यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळतात. भारताकडे टी-२० मध्ये पूर्णपणे नवीन संघ तयार आहे, ज्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. शुभमन गिलला कसोटीत कर्णधारपद मिळाल्यानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.


रोहित आणि विराट दोघांचेही लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकावर आहे. तथापि, हे दोघेही संघात स्थान मिळवू शकतात की नाही हे पाहणे बाकी आहे कारण वय दोघांच्याही मार्गात एक मोठा अडथळा आहे. रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला विश्वचषकात घेण्याचा विचार करत आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणर आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण त्याचे वय आहे. २०२७ पर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल. रोहित नक्कीच खेळू इच्छित असेल, परंतु संघ व्यवस्थापनाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनेक वेळा संदेश दिला आहे की, ते एक नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये तरुणांचा समावेश असेल जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धांपर्यंत चांगला अनुभव मिळेल.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र