रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदाला धोका?

मुंबई: रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना त्याच्या चाहत्यांना मैदानावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईलं असं वाटत होतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने अशी कुठलीही घोषणा केली नाही.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यांनी २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपदही पटकावलं होतं. रोहितकडे वनडे क्रिकेटमधील विश्वचषक ट्रॉफी नाही. २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली तो भारतासाठी ही ट्रॉफी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तो यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत रोहितचे लक्ष्य २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे.


सध्या भारतीय संघात अनेक बदल होताना दिसत आहेत. विराट कोहली आणि रोहित यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळतात. भारताकडे टी-२० मध्ये पूर्णपणे नवीन संघ तयार आहे, ज्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. शुभमन गिलला कसोटीत कर्णधारपद मिळाल्यानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.


रोहित आणि विराट दोघांचेही लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकावर आहे. तथापि, हे दोघेही संघात स्थान मिळवू शकतात की नाही हे पाहणे बाकी आहे कारण वय दोघांच्याही मार्गात एक मोठा अडथळा आहे. रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला विश्वचषकात घेण्याचा विचार करत आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणर आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण त्याचे वय आहे. २०२७ पर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल. रोहित नक्कीच खेळू इच्छित असेल, परंतु संघ व्यवस्थापनाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनेक वेळा संदेश दिला आहे की, ते एक नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये तरुणांचा समावेश असेल जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धांपर्यंत चांगला अनुभव मिळेल.

Comments
Add Comment

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये