रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदाला धोका?

मुंबई: रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना त्याच्या चाहत्यांना मैदानावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईलं असं वाटत होतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने अशी कुठलीही घोषणा केली नाही.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यांनी २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपदही पटकावलं होतं. रोहितकडे वनडे क्रिकेटमधील विश्वचषक ट्रॉफी नाही. २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली तो भारतासाठी ही ट्रॉफी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तो यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत रोहितचे लक्ष्य २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे.


सध्या भारतीय संघात अनेक बदल होताना दिसत आहेत. विराट कोहली आणि रोहित यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळतात. भारताकडे टी-२० मध्ये पूर्णपणे नवीन संघ तयार आहे, ज्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. शुभमन गिलला कसोटीत कर्णधारपद मिळाल्यानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.


रोहित आणि विराट दोघांचेही लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकावर आहे. तथापि, हे दोघेही संघात स्थान मिळवू शकतात की नाही हे पाहणे बाकी आहे कारण वय दोघांच्याही मार्गात एक मोठा अडथळा आहे. रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला विश्वचषकात घेण्याचा विचार करत आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणर आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण त्याचे वय आहे. २०२७ पर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल. रोहित नक्कीच खेळू इच्छित असेल, परंतु संघ व्यवस्थापनाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनेक वेळा संदेश दिला आहे की, ते एक नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये तरुणांचा समावेश असेल जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धांपर्यंत चांगला अनुभव मिळेल.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना