रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदाला धोका?

मुंबई: रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना त्याच्या चाहत्यांना मैदानावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईलं असं वाटत होतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने अशी कुठलीही घोषणा केली नाही.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यांनी २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपदही पटकावलं होतं. रोहितकडे वनडे क्रिकेटमधील विश्वचषक ट्रॉफी नाही. २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली तो भारतासाठी ही ट्रॉफी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तो यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत रोहितचे लक्ष्य २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे.


सध्या भारतीय संघात अनेक बदल होताना दिसत आहेत. विराट कोहली आणि रोहित यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळतात. भारताकडे टी-२० मध्ये पूर्णपणे नवीन संघ तयार आहे, ज्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. शुभमन गिलला कसोटीत कर्णधारपद मिळाल्यानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.


रोहित आणि विराट दोघांचेही लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकावर आहे. तथापि, हे दोघेही संघात स्थान मिळवू शकतात की नाही हे पाहणे बाकी आहे कारण वय दोघांच्याही मार्गात एक मोठा अडथळा आहे. रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला विश्वचषकात घेण्याचा विचार करत आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणर आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण त्याचे वय आहे. २०२७ पर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल. रोहित नक्कीच खेळू इच्छित असेल, परंतु संघ व्यवस्थापनाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनेक वेळा संदेश दिला आहे की, ते एक नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये तरुणांचा समावेश असेल जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धांपर्यंत चांगला अनुभव मिळेल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत