Raj Thackeray Birthday: १४ जूनला शिवतीर्थावर येऊ नका; राज ठाकरे यांचे आवाहन

  86

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा १४ जून हा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून मनसैनिक या दिवशी मुंबईतील शिवतीर्थावर येऊन त्यांना शुभेच्छा देतात. मात्र यंदा ही परंपरा खंडित होणार आहे. राज ठाकरे यांनी स्वतः पत्राद्वारे मनसैनिकांना यावर्षी शिवतीर्थावर न येण्याचं आवाहन केलं आहे.



मुंबईबाहेर जाणार असल्याचे स्पष्टीकरण


या वर्षी १४ जून रोजी म्हणजेच वाढदिवसाच्या दिवशी ते सहकुटुंब मुंबईबाहेर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “मी वाढदिवस साजरा करणार नाहीये, किंवा काही विशेष कारण आहे असेही नाही. त्यामुळे कोणतेही वेगळे अर्थ काढू नयेत,” असेही त्यांनी नमूद केले आहे.





“तुमच्या भेटीला लवकरच येईन”


राज ठाकरे यांनी आपल्या भावनिक पत्रात पुढे लिहिलं आहे की, “गेली अनेक वर्षं तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी भेटायला याल, हे निश्चित असतं. प्रत्येकाच्या भेटीचं, शुभेच्छांचं आणि प्रेमाचं मी ऋण मानतो. यंदा तुमचं दर्शन घडणार नाही, याची खंत राहील. पण मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा भेट निश्चित आहे.”



‘लोकोपयोगी कार्य करा’


राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी आपल्या भागात लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्याचं आवाहन केलं आहे. “तुमच्या भागात सामाजिक उपक्रम राबवले, तर तेच माझ्या वाढदिवसाचं खऱ्या अर्थाने औचित्य ठरेल,” असं ते म्हणाले.


“तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करा. आपण लवकरच भेटू,” असा सकारात्मक संदेश देत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे. राज ठाकरे यांचं हे आवाहन एका जबाबदार नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचं आणि संवेदनशीलतेचं उदाहरण ठरतं.

Comments
Add Comment

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा मुंबई :

अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा

सुरक्षिततेसाठी असणारे बेरिकेट्स ठरताहेत धोकादायक

वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी कांदिवली  : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक

‘तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निणर्य घेणार'

मुंबई : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे