वाकण महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

पाली-खोपोलीतील वाहनचालक, नागरिक त्रस्त


सुधागड-पाली : वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील दयनीय स्थितीमुळे प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील खड्डे आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्डे हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.


पाली शहरातील हा महामार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील मोठा खड्डा आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना वेग कमी करून सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेकदा अचानक ब्रेक लावल्याने मागील वाहनांची धडक लागण्याचा धोका निर्माण होतो.


सध्या पावसाळा तोंडावर आला असताना, महामार्गावरील खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे अधिक खोल होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.


नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी एमएसआरडीसीने त्वरित दखल घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होईल आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तक्रारींची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.