पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस! पेरण्यांची घाई नको

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी परिस्थितीचा आढावा


मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.


या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘राज्यातील सर्व भागात पंधरा जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. पंधरा जून नंतरच पावसानंतर मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी, बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के, चार जिल्ह्यांत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.



मोसमी पाऊस तीन-चार दिवसांत सक्रिय


मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १२ जून रोजी मराठवाड्यातील काही भागात १२ ते १४ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे १२ आणि १५ जून दरम्यान मुसळधार तर १३, १४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करुन ठेवावा, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.



धरणातील पाणीसाठा समाधानकारक


राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी माहिती दिली.

Comments
Add Comment

नवख्या सहायक आयुक्तांना प्रशासनाने दिले थेट तोफेच्या तोंडी

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील विभागात नवख्या सहायक आयुक्तांची नियुक्ती मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे, औषध दुकानांसाठी आवारात जागा..

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील औषधे उपलब्ध करून देण्याच्या

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, सहा प्रभागांमध्ये झाले सुधारीत बदल

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद