विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार
अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार आहे. या संदर्भातील निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समिती घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.
अकोल्यातील भूमिगत गटार योजनेसाठी लागणारा महापालिकेचा 30 टक्के भाग राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच जनतेने आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी सत्ता दिलेली नाही, तर विकासासाठी दिलेला आहे. आमचा भविष्यात ऑनलाईन कामावर भर राहणार आहे. वर्षाच्या अखेर पर्यंत आम्हाला सर्व ऑनलाईन करायचं आहे. तसंच विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार, असंही फडणवीस यांनी सांगितलं.