रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आता तिकीट आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या २४ तास अगोदरच जाहीर होणार

मुंबई : मुंबईसह देशभरात रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. यासह रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे भारतीय रेल्वे विभाग सातत्याने टीकेचा सामना करत आहे. अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेकडे अधिक लक्ष देत काही बदल करण्याचं ठरवलं आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी भारतीय रेल्वे तिकीट बूकिंग नियमांमध्ये काही बदल करणार आहे. रेल्वे प्रवाशांची रिझर्व्हेशन यादी आता प्रवास सुरू होण्याच्या २४ तास आधी तयार केली जाईल. याचाच अर्थ वेटिंगवर असलेल्या (वेटलिस्टेड) प्रवाशांना आता २४ तास आधीच समजेल की त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही.


रेल्वेने याबाबतची माहिती देताना म्हटलं आहे की ज्या प्रवाशांचं तिकीट वेटिंगवर असेल त्यांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी माहिती दिली जाईल की त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही. याआधी रेल्वेची कन्फर्मेशन यादी (चार्ट) ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी जारी केली जात होती. त्यामुळे वेटलिस्टेड प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कारण तिकीटाच्या पुष्टीसाठी शेवटपर्यंत कोणतीही निश्चित माहिती मिळत नव्हती. मात्र,त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असे.आता रेल्वे प्रवाशांची चिंता दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे.



रेल्वे अधिकाऱ्यांनाही होणार फायदा


रेल्वे प्रशासन करत असलेल्या या बदलामुळे अधिकाऱ्यांना, स्टेशन मास्तरांना, रेल्वेंचं नियोजन करणाऱ्यांना अधिक चांगलं प्लॅनिंग करण्यास मदत मिळेल. किती प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट आहे, किती प्रवासी वेटलिस्टेड आहेत यासह बरीच माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडे २४ तास आधीच उपलब्ध असेल. प्रवाशांची संख्या पाहून रेल्वे प्रशासन इंजिनाला अधिक डबे जोडू शकतं किंवा कमी करू शकतं, प्रवाशांसाठी पुरेशी आसनव्यवस्था करू शकतं. तसेच फलाटांवरील व्यवस्थेकडे लक्ष देऊ शकतं.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने विद्यमान तिकीट प्रणालीत, तिकीट नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तत्काळ तिकीट बूकिंग व इतर सर्व आरक्षण प्रक्रिया जैसे थे स्थितीत सुरू राहतील. रेल्वेने केवळ एकच बदल केला आहे. केवळ फायनल रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याची वेळ बदलली आहे. हा चार्ट पूर्वी ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी तयार केला जात होता जो आता २४ तास आधी तयार केला जाईल. ज्यामुळे प्रवाशांना अधिक फ्लेक्सिबिलीटी व पर्याय मिळतील.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र