Rajasthan Accident : साथ जन्माची गाठ अधुरी! भीषण अपघातात वधू-वरासह ५ जण जागीच ठार

जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दौसा-मनोहरपूर मार्गावर भटकबास गावानजीक सकाळी ६.१५ वाजता झालेल्या या भीषण अपघातात लग्न करून घरी परतणारे वर-वधू देखील मृत्यूमुखी पडलेत.



पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. जीपमधील लोक लग्न समारंभाला उपस्थित राहून मध्यप्रदेशहून परतत होते. स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले.जखमींना निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात रायसर पोलिस स्टेशनचे प्रभारी रघुवीर म्हणाले रीस अपघातानंतर महामार्गावर जाम झाला आणि गोंधळ उडाला. वऱ्हाडींची जीप मध्यप्रदेशहून मनोहरपूरला जात होती. जखमींचे जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली जात आहे. काही गंभीर जखमींना एनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी