
जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दौसा-मनोहरपूर मार्गावर भटकबास गावानजीक सकाळी ६.१५ वाजता झालेल्या या भीषण अपघातात लग्न करून घरी परतणारे वर-वधू देखील मृत्यूमुखी पडलेत.

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) केल्यानंतर सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. जेणेकरून राजा रघुवंशीची ...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. जीपमधील लोक लग्न समारंभाला उपस्थित राहून मध्यप्रदेशहून परतत होते. स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले.जखमींना निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात रायसर पोलिस स्टेशनचे प्रभारी रघुवीर म्हणाले रीस अपघातानंतर महामार्गावर जाम झाला आणि गोंधळ उडाला. वऱ्हाडींची जीप मध्यप्रदेशहून मनोहरपूरला जात होती. जखमींचे जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली जात आहे. काही गंभीर जखमींना एनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.