‘त्या’ शाळांमधील विद्यार्थी समायोजनाकडे पाठ

उन्हाळी सुट्ट्यांमुळे पालिकेपुढे पेच


ठाणे : अनधिकृत शाळांवर ठाणे पालिकेकडून कारवाई करीत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या शाळांतील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु अनधिकृत शाळांच्या पालकांची मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजनास करण्यास उदासीनता दिसून आली आहे. अधिकृत शाळांची फीदेखील परवडणारी नसल्याने पालकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने पालक गावी गेल्याने त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.



ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा आढावा घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ८१ अनधिकृत शाळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यापैकी ६८ शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या शाळांमधून १९ हजार ७०८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली होती. ज्या अनधिकृत शाळा सुरू आहेत त्या तत्काळ बंद करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने संबंधित शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या