‘त्या’ शाळांमधील विद्यार्थी समायोजनाकडे पाठ

  49

उन्हाळी सुट्ट्यांमुळे पालिकेपुढे पेच


ठाणे : अनधिकृत शाळांवर ठाणे पालिकेकडून कारवाई करीत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या शाळांतील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु अनधिकृत शाळांच्या पालकांची मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजनास करण्यास उदासीनता दिसून आली आहे. अधिकृत शाळांची फीदेखील परवडणारी नसल्याने पालकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने पालक गावी गेल्याने त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.



ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा आढावा घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ८१ अनधिकृत शाळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यापैकी ६८ शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या शाळांमधून १९ हजार ७०८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली होती. ज्या अनधिकृत शाळा सुरू आहेत त्या तत्काळ बंद करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने संबंधित शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या