‘त्या’ शाळांमधील विद्यार्थी समायोजनाकडे पाठ

  45

उन्हाळी सुट्ट्यांमुळे पालिकेपुढे पेच


ठाणे : अनधिकृत शाळांवर ठाणे पालिकेकडून कारवाई करीत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या शाळांतील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु अनधिकृत शाळांच्या पालकांची मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजनास करण्यास उदासीनता दिसून आली आहे. अधिकृत शाळांची फीदेखील परवडणारी नसल्याने पालकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने पालक गावी गेल्याने त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.



ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा आढावा घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ८१ अनधिकृत शाळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यापैकी ६८ शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या शाळांमधून १९ हजार ७०८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली होती. ज्या अनधिकृत शाळा सुरू आहेत त्या तत्काळ बंद करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने संबंधित शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध