अंधेरी सबवेला पाणी साचण्याची समस्या राहणार कायम

भूमिगत टाकी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही


मुंबई  : मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले जाऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने पंपिंग स्टेशन तसेच विशेष पंपांची व्यवस्था केली जाते; परंतु आतापर्यंत हिंदमाता, मिलन सब वे येथील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी अंधेरी सबवेच्या ठिकाणी साचले जाणारे पावसाचे पाणी कायमच राहणार आहे. मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर सन २०२७च्या पावसाळ्यात दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात ही समस्या कायमस्वरुपी सुटणारी नाही. हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवले जात असले तरी अंधेरी सब वेच्या ठिकाणी अशाप्रकारे भूमिगत टाक्या बांधण्याचा मार्गच नसल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात नाही पण काही प्रमाणात पाणी तुंबण्याची समस्या कायमच राहणारी आहे.


मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात अंधेरी सब वेच्या ठिकाणी पाणी साचले गेले. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंप बसवले जात असले तरी समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास विलंब लागतो आणि परिसरात आहोटी येईपर्यंत पाणी कायमच राहते.


या ठिकाणच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनच्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १९ वर्षांपासून काम रखडले. यासाठी महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे.


याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १८ ते १९ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही कायमच राहणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यातही अंधेररीवासियांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि 'युएई'ला मागे टाकणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; १० वर्षांत अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढवला मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता

Maharashtra Weather Update : कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट, राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यात

BMC Makes 4-Way Waste Segregation : मुंबईत कचराकोंडीवर बीएमसीचा 'मास्टरस्ट्रोक': मोठ्या सोसायट्या, हॉटेल्ससाठी '४-स्तरीय' कचरा वर्गीकरण सक्तीचे!

मुंबई : मुंबई शहराला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या अक्राळविक्राळ समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी