अंधेरी सबवेला पाणी साचण्याची समस्या राहणार कायम

भूमिगत टाकी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही


मुंबई  : मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले जाऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने पंपिंग स्टेशन तसेच विशेष पंपांची व्यवस्था केली जाते; परंतु आतापर्यंत हिंदमाता, मिलन सब वे येथील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी अंधेरी सबवेच्या ठिकाणी साचले जाणारे पावसाचे पाणी कायमच राहणार आहे. मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर सन २०२७च्या पावसाळ्यात दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात ही समस्या कायमस्वरुपी सुटणारी नाही. हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवले जात असले तरी अंधेरी सब वेच्या ठिकाणी अशाप्रकारे भूमिगत टाक्या बांधण्याचा मार्गच नसल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात नाही पण काही प्रमाणात पाणी तुंबण्याची समस्या कायमच राहणारी आहे.


मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात अंधेरी सब वेच्या ठिकाणी पाणी साचले गेले. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पंप बसवले जात असले तरी समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास विलंब लागतो आणि परिसरात आहोटी येईपर्यंत पाणी कायमच राहते.


या ठिकाणच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनच्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १९ वर्षांपासून काम रखडले. यासाठी महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे.


याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १८ ते १९ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही कायमच राहणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यातही अंधेररीवासियांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात