Sonam Raghuvanshi: राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने सुटणार होती सोनम, पोलिसांच्या ट्रिकमुळे अडकली

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) केल्यानंतर सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. जेणेकरून राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे कुणालाच कळणार नव्हतं. मात्र,  पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला, यासाठी पोलिसांनी एक ट्रिक वापरून पाहिली, ज्यामुळे सोनमने सर्व काही भडभडा ओकून दिलं.


राजा रघुवंशीचे शव मिळाल्यानंतरही सोनमचा काही पता लागत नव्हता. यादरम्यान सोनमचे कुणी अपहरण केले आहे का? याबाबत पोलिस तपास करत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरील सोनमचे काही संशयास्पद हावभाव पाहता, तिनेच हा कट रचून आणल्याचा संशय दाट होत गेला. दरम्यान, सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे, सोनमचा प्रियकर राज कुशवाहला ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.



राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम आणि राजचा काय प्लॅन होता?


राजा रघुवंशीच्या हत्येला लुटमारीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सोनम आणि राज कुशवाहचा होता. या दोघांचा प्लॅन होता की, सोनम गाझीपूरमध्ये अशा स्थितीत सापडेल की तिला लुटण्यात आलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल. दरोडेखोरांनी मला इथेच सोडलं असं सोनमला सांगायला सांगितलं. सोनमने ढाबा मालकाला देखील हेच सांगितलं होतं. सोनम आणि राज यांनी असा प्लॅन केला होता की, सोनम अशा प्रकारे कुटुंबासमोर येईन, जेणेकरून कोणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही. पण पोलिसांच्या ट्रिकने त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला.

Comments
Add Comment

Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार