Sonam Raghuvanshi: राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने सुटणार होती सोनम, पोलिसांच्या ट्रिकमुळे अडकली

  196

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) केल्यानंतर सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. जेणेकरून राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे कुणालाच कळणार नव्हतं. मात्र,  पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला, यासाठी पोलिसांनी एक ट्रिक वापरून पाहिली, ज्यामुळे सोनमने सर्व काही भडभडा ओकून दिलं.


राजा रघुवंशीचे शव मिळाल्यानंतरही सोनमचा काही पता लागत नव्हता. यादरम्यान सोनमचे कुणी अपहरण केले आहे का? याबाबत पोलिस तपास करत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरील सोनमचे काही संशयास्पद हावभाव पाहता, तिनेच हा कट रचून आणल्याचा संशय दाट होत गेला. दरम्यान, सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे, सोनमचा प्रियकर राज कुशवाहला ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.



राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम आणि राजचा काय प्लॅन होता?


राजा रघुवंशीच्या हत्येला लुटमारीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सोनम आणि राज कुशवाहचा होता. या दोघांचा प्लॅन होता की, सोनम गाझीपूरमध्ये अशा स्थितीत सापडेल की तिला लुटण्यात आलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल. दरोडेखोरांनी मला इथेच सोडलं असं सोनमला सांगायला सांगितलं. सोनमने ढाबा मालकाला देखील हेच सांगितलं होतं. सोनम आणि राज यांनी असा प्लॅन केला होता की, सोनम अशा प्रकारे कुटुंबासमोर येईन, जेणेकरून कोणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही. पण पोलिसांच्या ट्रिकने त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला.

Comments
Add Comment

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही