Sonam Raghuvanshi: राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने सुटणार होती सोनम, पोलिसांच्या ट्रिकमुळे अडकली

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) केल्यानंतर सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. जेणेकरून राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे कुणालाच कळणार नव्हतं. मात्र,  पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला, यासाठी पोलिसांनी एक ट्रिक वापरून पाहिली, ज्यामुळे सोनमने सर्व काही भडभडा ओकून दिलं.


राजा रघुवंशीचे शव मिळाल्यानंतरही सोनमचा काही पता लागत नव्हता. यादरम्यान सोनमचे कुणी अपहरण केले आहे का? याबाबत पोलिस तपास करत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरील सोनमचे काही संशयास्पद हावभाव पाहता, तिनेच हा कट रचून आणल्याचा संशय दाट होत गेला. दरम्यान, सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे, सोनमचा प्रियकर राज कुशवाहला ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.



राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम आणि राजचा काय प्लॅन होता?


राजा रघुवंशीच्या हत्येला लुटमारीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सोनम आणि राज कुशवाहचा होता. या दोघांचा प्लॅन होता की, सोनम गाझीपूरमध्ये अशा स्थितीत सापडेल की तिला लुटण्यात आलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल. दरोडेखोरांनी मला इथेच सोडलं असं सोनमला सांगायला सांगितलं. सोनमने ढाबा मालकाला देखील हेच सांगितलं होतं. सोनम आणि राज यांनी असा प्लॅन केला होता की, सोनम अशा प्रकारे कुटुंबासमोर येईन, जेणेकरून कोणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही. पण पोलिसांच्या ट्रिकने त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला.

Comments
Add Comment

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण