Sonam Raghuvanshi: राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने सुटणार होती सोनम, पोलिसांच्या ट्रिकमुळे अडकली

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) केल्यानंतर सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. जेणेकरून राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे कुणालाच कळणार नव्हतं. मात्र,  पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला, यासाठी पोलिसांनी एक ट्रिक वापरून पाहिली, ज्यामुळे सोनमने सर्व काही भडभडा ओकून दिलं.


राजा रघुवंशीचे शव मिळाल्यानंतरही सोनमचा काही पता लागत नव्हता. यादरम्यान सोनमचे कुणी अपहरण केले आहे का? याबाबत पोलिस तपास करत होते. मात्र सीसीटीव्ही फुटेजवरील सोनमचे काही संशयास्पद हावभाव पाहता, तिनेच हा कट रचून आणल्याचा संशय दाट होत गेला. दरम्यान, सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे, सोनमचा प्रियकर राज कुशवाहला ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.



राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम आणि राजचा काय प्लॅन होता?


राजा रघुवंशीच्या हत्येला लुटमारीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सोनम आणि राज कुशवाहचा होता. या दोघांचा प्लॅन होता की, सोनम गाझीपूरमध्ये अशा स्थितीत सापडेल की तिला लुटण्यात आलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल. दरोडेखोरांनी मला इथेच सोडलं असं सोनमला सांगायला सांगितलं. सोनमने ढाबा मालकाला देखील हेच सांगितलं होतं. सोनम आणि राज यांनी असा प्लॅन केला होता की, सोनम अशा प्रकारे कुटुंबासमोर येईन, जेणेकरून कोणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही. पण पोलिसांच्या ट्रिकने त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला.

Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून