Rajasthan: पिकनिकसाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी आलेले ११ तरुण बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यापैकी ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले आहेत.सोमवारी (दि.१०)दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. बनास नदीच्या एका जुन्या पुलापाशी हे तरुण पिकनिकसाठी आले होते.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण एकत्रच पाण्यात उतरले होते. परंतू, काही वेळातच पाण्याचा वेग वाढला आणि सर्वजण एकामागोमाग एक पाण्यात खेचले गेले. स्थानिकांनी आरडाओरडा करत पोलिसांना याची माहिती दिली. टोंक पोलीस आणि एसडीआरएफची टीम तिथे पोहोचली परंतू तोवर उशीर झाला होता. या तरुणांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी ८ तरुणांचे मृतदेह सापडले आहेत.


या सर्वांना सआदत ह़ॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून डॉक्टरांनी या सर्व आठही जणांना मृत घोषित केले आहे. एसपींनी सांगितले की, तीन तरुण जिवंत आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली जात आहे.गावकऱ्यांनुसार ज्या भागात ते उतरले होते तो खोलगट आहे. यामुळे अनेकजण तिथे बुडालेले आहेत. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मृतांचे नातेवाईक, स्थानिक जमा झालेले आहेत. सर्वजण जयपूरचे असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत