Sonam Raghuwanshi : ‘कुऱ्हाडीने हत्या’; ५० हजाराची सुपारी...राजाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?

राजा रघुवंशीच्या मर्डरचा पत्नीनेचं रचला कट



मेघालय : पत्नी सोनम रघवंशीच बेवफा सनम ठरली. प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्या पती राज रघुवशींची प्रियकराच्या मदतीने थंड डोक्याने काटा काढण्याची योजना तिनं आखली. मेघालयमधील निसर्गरम्य शिलाँगमध्ये सुरु झालेली एक हनिमून ट्रिप एका भयानक हत्येच्या रूपात संपली. इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी (Raja Raghuwanshi) आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuwanshi)  २० मे २०२५ रोजी शिलाँगला पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांत, २३ मे रोजी एक असा कट रचण्यात आला, ज्याने राजाचा जीव घेतला आणि देशभरात खळबळ उडाली. या गुन्ह्यात आता त्याची पत्नी सोनम हिचेच नाव पुढे आले असून, तीच पतीच्या हत्येच्या कटात सहभागी होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात दरदिवशी नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. त्याशिवाय अन्य चार आरोपींना सुद्धा अटक केली आहे. पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने मिळून हत्येचा कट रचला. लग्नानंतर अवघ्या ५ दिवसात सोनमने राजा रघुवंशीच्या मर्डरची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली.




'मी विधवा होईन',मग पप्पा... 


राजा आणि सोनमच लग्न ११ मे रोजी झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्वकाही सामान्य वाटत होतं. पोलीस सूत्रांनुसार, १६ मे रोजी सोनमने प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजाला मार्गातून हटवण्याची योजना बनवली. सोनमने राज कुशवाहला सांगितलं, राजा रघुवंशीला संपवून टाक. लुटीमारीच्या उद्देशाने हत्या झाली आहे, असं भासवू. त्यानंतर मी विधवा होईन. मग पप्पा आपल्या लग्नाला मंजुरी देतील.




हत्या कशी घडली?


२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि दोघे ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले. २४ मे रोजी रात्री त्यांची स्कूटी शिलाँगपासून २५ किमी अंतरावर ओसारा हिल्सच्या पार्किंगमध्ये सापडली. २८ मे रोजी जंगलात दोन बॅगा सापडल्या. राजाच्या भावाने या बॅगांची ओळख पटवली. त्याच दिवशी वेसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीतून राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत देहाजवळ सोनमचे कपडे, औषधं, आणि एक रक्ताने माखलेला 'दाओ' (खासी जमातीचा पारंपरिक चाकू) मिळाला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयपणे हल्ला झाला होता – त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून, चाकूने अनेक वार करण्यात आले होते.



हत्येसाठी किती हजार दिले?


पोलीस सूत्रांनुसार राजाची ज्या कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली, ती गुवहाटीत ऑनलाइन ऑर्डर करण्यात आली होती. आरोपी घटनेच्या आधी सोनमच्या होमस्टेपासून १ किलोमीटर अंतरावर थांबले होते. सोनम त्यांना लोकेशन पाठवत होती. सोनमने या हत्येसाठी ५० हजाराची सुपारी दिली होती.




सोनमचाच सहभाग, आत्मसमर्पणानंतर कबुली!


सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती. या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला की, ते त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे.

Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना