Sonam Raghuwanshi : ‘कुऱ्हाडीने हत्या’; ५० हजाराची सुपारी...राजाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?

राजा रघुवंशीच्या मर्डरचा पत्नीनेचं रचला कट



मेघालय : पत्नी सोनम रघवंशीच बेवफा सनम ठरली. प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्या पती राज रघुवशींची प्रियकराच्या मदतीने थंड डोक्याने काटा काढण्याची योजना तिनं आखली. मेघालयमधील निसर्गरम्य शिलाँगमध्ये सुरु झालेली एक हनिमून ट्रिप एका भयानक हत्येच्या रूपात संपली. इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी (Raja Raghuwanshi) आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuwanshi)  २० मे २०२५ रोजी शिलाँगला पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांत, २३ मे रोजी एक असा कट रचण्यात आला, ज्याने राजाचा जीव घेतला आणि देशभरात खळबळ उडाली. या गुन्ह्यात आता त्याची पत्नी सोनम हिचेच नाव पुढे आले असून, तीच पतीच्या हत्येच्या कटात सहभागी होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात दरदिवशी नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. त्याशिवाय अन्य चार आरोपींना सुद्धा अटक केली आहे. पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने मिळून हत्येचा कट रचला. लग्नानंतर अवघ्या ५ दिवसात सोनमने राजा रघुवंशीच्या मर्डरची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली.




'मी विधवा होईन',मग पप्पा... 


राजा आणि सोनमच लग्न ११ मे रोजी झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्वकाही सामान्य वाटत होतं. पोलीस सूत्रांनुसार, १६ मे रोजी सोनमने प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजाला मार्गातून हटवण्याची योजना बनवली. सोनमने राज कुशवाहला सांगितलं, राजा रघुवंशीला संपवून टाक. लुटीमारीच्या उद्देशाने हत्या झाली आहे, असं भासवू. त्यानंतर मी विधवा होईन. मग पप्पा आपल्या लग्नाला मंजुरी देतील.




हत्या कशी घडली?


२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि दोघे ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले. २४ मे रोजी रात्री त्यांची स्कूटी शिलाँगपासून २५ किमी अंतरावर ओसारा हिल्सच्या पार्किंगमध्ये सापडली. २८ मे रोजी जंगलात दोन बॅगा सापडल्या. राजाच्या भावाने या बॅगांची ओळख पटवली. त्याच दिवशी वेसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीतून राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत देहाजवळ सोनमचे कपडे, औषधं, आणि एक रक्ताने माखलेला 'दाओ' (खासी जमातीचा पारंपरिक चाकू) मिळाला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयपणे हल्ला झाला होता – त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून, चाकूने अनेक वार करण्यात आले होते.



हत्येसाठी किती हजार दिले?


पोलीस सूत्रांनुसार राजाची ज्या कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली, ती गुवहाटीत ऑनलाइन ऑर्डर करण्यात आली होती. आरोपी घटनेच्या आधी सोनमच्या होमस्टेपासून १ किलोमीटर अंतरावर थांबले होते. सोनम त्यांना लोकेशन पाठवत होती. सोनमने या हत्येसाठी ५० हजाराची सुपारी दिली होती.




सोनमचाच सहभाग, आत्मसमर्पणानंतर कबुली!


सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती. या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला की, ते त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा