कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाचा दुवा

गृहराज्यमंत्री भोयर यांचे प्रतिपादन


पालघर : गाव पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पालघर येथे सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.



या कार्यशाळेस खा. हेमंत सवरा, आ. राजेंद्र गावित, आ. हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.


मागच्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या २ हजार ते ३ हजार मानधनावर काम करीत होते. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना १५ हजार रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून २८२ रिक्त पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे. पोलीस पाटील यांना सुद्धा डिजीटल होणे आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटीलसुद्धा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत, याचा आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याकरीता पोलीस पाटील हे पद महत्वाचे आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील