कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाचा दुवा

गृहराज्यमंत्री भोयर यांचे प्रतिपादन


पालघर : गाव पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पालघर येथे सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.



या कार्यशाळेस खा. हेमंत सवरा, आ. राजेंद्र गावित, आ. हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.


मागच्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या २ हजार ते ३ हजार मानधनावर काम करीत होते. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना १५ हजार रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून २८२ रिक्त पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे. पोलीस पाटील यांना सुद्धा डिजीटल होणे आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटीलसुद्धा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत, याचा आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याकरीता पोलीस पाटील हे पद महत्वाचे आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता