कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाचा दुवा

  55

गृहराज्यमंत्री भोयर यांचे प्रतिपादन


पालघर : गाव पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पालघर येथे सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.



या कार्यशाळेस खा. हेमंत सवरा, आ. राजेंद्र गावित, आ. हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.


मागच्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या २ हजार ते ३ हजार मानधनावर काम करीत होते. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना १५ हजार रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून २८२ रिक्त पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे. पोलीस पाटील यांना सुद्धा डिजीटल होणे आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटीलसुद्धा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत, याचा आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याकरीता पोलीस पाटील हे पद महत्वाचे आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,