कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाचा दुवा

गृहराज्यमंत्री भोयर यांचे प्रतिपादन


पालघर : गाव पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पालघर येथे सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.



या कार्यशाळेस खा. हेमंत सवरा, आ. राजेंद्र गावित, आ. हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.


मागच्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या २ हजार ते ३ हजार मानधनावर काम करीत होते. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना १५ हजार रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून २८२ रिक्त पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे. पोलीस पाटील यांना सुद्धा डिजीटल होणे आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटीलसुद्धा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत, याचा आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याकरीता पोलीस पाटील हे पद महत्वाचे आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृह बांधकामाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील