Vat Pournima : आगळीवेगळी वटपौर्णिमा! कुडाळमध्ये नवरोबांनी वडाला फेऱ्या घालत केला 'वट सावित्री व्रत'

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना


गेल्या १६ वर्षांची परंपरा


सिंधुदुर्ग : वटपौर्णिमा हा सण महिलाच साजरा करतात असं आतापर्यंत समजलं जात होतं. ७ जन्म हाच पती मिळावा ही इच्छा मनी ठेऊन वडाचे पूजन केले जाते. तर संपूर्ण दिवस उपवासही केला जातो. मात्र, गेली १६ वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली.


सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा सण साजरा केला जातॊ. खरंतर हा महिलांचा सण. जसं वटवृक्षाला मोठं आयुष्य असतं तसंच आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून सुवासिनी कामना करतात. वडाची पूजा करतात. पण स्त्री आणि पुरुष हि संसार रथाची दोन चाकं आहेत. म्हणून जस एखादी स्त्री आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते तसं मग पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी का करू नये, असा विचार करून कुडाळ मध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आणि मित्रमंडळी गेली १५ वर्ष आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा व्रत साजरं करत आहेत. या व्रताचं यंदाच हे सोळावं वर्ष आहे. आज सुद्धा वट पौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती. श्री गवळदेवाला सांगणं करून सर्वांच्या वतीने उमेश गाळवणकर यांनी वडाची यथोचित पूजा केली. त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळला.



आपली पत्नी दरवर्षी आपल्या दिर्घायूसाठी वट वृक्षाची पूजा करते. मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये असा विचार करून गेली १६ वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत असल्याचं प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितलं. हि परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरु करावी. आपल्या चांगल्या परंपरा जपाव्या अशी अपेक्षा प्रा. अरुण मर्गज यांनी व्यक्त केली. महिला नेहमीच वटपौर्णिमा साजरी करतात पण कुडाळ मधले पुरुष गेली १६ वर्ष हे व्रत आपल्या पत्नीसाठी करताहेत ते तेवढंच कौतुकास्पद आणि सर्वानी आदर्श घेण्यासारखं आहे असं सौ. अमृता गाळवणकर यांनी सांगितलं.


यावेळी उमेश गाळवणकर आणि सौ.अमृता गाळवणकर यांनी एकत्र वट वृक्षाला फेऱ्या मारून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. या सोहळ्यात उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मार्गज, राजू कलिंगण, प्रसाद कानडे, प्रा. परेश धावडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, महादेव परब, बळीराम जांभळे, अजय भाईप, सुरेश वरक सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला

West Bengal : विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान; ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. या टप्प्यात राज्यातील १४२

Pune Crime : पुण्यात दहशत कायम; भाजप कार्यकर्त्यावर ९ राऊंड फायर

मावळ : पुण्याची वाढती गुन्हेगारी आता पुणेकरांसाठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१