हुश्श ! व्यत्ययानंतर हार्बर आणि ट्रान्स हार्बरची वाहतूक पुन्हा सुरू

नेरुळ : नेरुळ स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होती. तंत्रज्ञांनी हा बिघाड दुरुस्त केला. यानंतर रेल्वे वाहतूक हळू हळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. कामावर जात असलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पण त्रज्ञांनी हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर रेल्वे वाहतूक हळू हळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. "किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा काही काळासाठी विस्कळीत झाल्या होत्या. आता सकाळी ०८:४७ वाजता या सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. गैरसोयीबद्दल क्षमस्व," असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी स्वीकारणार पदभार

- मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार मुंबई: दिवंगत

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे