दिल्लीत घराला आग, जगण्यासाठी सातव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : द्वारका सेक्टर तेरा मधील सबद अपार्टमेंट या निवासी इमारतीतील सातव्या मजल्यावर असलेल्या एका घराला आग लागली. आगीची झळ जाणवू लागताच घरात अडकलेल्या तीन जणांनी जीव वाचण्यासाठी थेट सातव्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या. हा निर्णय प्राणघातक ठरला. उड्या मारणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पुरुष आणि त्याची दोन मुले अशा तीन जणांचा समावेश आहे.



आग लागल्याची माहिती सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळासाठी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या एकूण आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि पूर्ण सदनिकेने पेट घेतला. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. इमारतीमधील काही रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. पण पदाधिकाऱ्यांनी त्वरेने कोणताही निर्णय घेतला. यामुळे वेळ वाया गेला. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषींवर कारवाईची शिफारस केली जाईल.
Comments
Add Comment

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या