बाराव्या म्हाडा लोकशाही दिनात ८ अर्जांवर झाली सुनावणी

  31

लोकाभिमुख निर्णयातून अर्जदारांना मिळाला दिलासा


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात १२वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकशाही दिनात नागरिकांच्या ८अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करत तत्परतेने निर्णय घेतला.



अँटॉप हिल वडाळा पूर्व येथील सदनिकेचा ताबा विकासकाकडून मिळू शकला नाही याकरिता निगुडकर यांनी अर्ज केला होता. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर प्रकरणी चर्चा करण्यासाठी संबंधित विकासकास तात्काळ म्हाडा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच निगुडकर यांना वितरित करण्यात आलेल्या बृहतसूचिवरील सदनिकेचा ताबा आज सकाळी बारा वाजेपर्यंत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गोरेगाव पश्चिम येथील स्नेहदीप सोसायटीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरूद्ध संजय भैरे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेवर होत असलेला अनधिकृत वापर तत्काळ थांबवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.


तसेच गिरगाव येथील भंडारवाडा क्रॉस रोडवरील दुर्गादेवी सोसायटी या पुनर्रचित इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून देण्याच्या मागणीसाठी गणेश शिंदे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी इमारतीच्या बाहेरील भागातील पाईपची व बंद पडलेल्या लिफ्टची तात्काळ दुरुस्ती करावी. सदर दुरुस्तीचे काम सोसायटीतील सभासदांनी नेमलेल्या देखरेख समितीच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकशाही दिनात मुंबई मंडळाशी संबंधित ४, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ ३, छत्रपती संभाजी मंडळाशी संबंधित १ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता