बाराव्या म्हाडा लोकशाही दिनात ८ अर्जांवर झाली सुनावणी

लोकाभिमुख निर्णयातून अर्जदारांना मिळाला दिलासा


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात १२वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकशाही दिनात नागरिकांच्या ८अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करत तत्परतेने निर्णय घेतला.



अँटॉप हिल वडाळा पूर्व येथील सदनिकेचा ताबा विकासकाकडून मिळू शकला नाही याकरिता निगुडकर यांनी अर्ज केला होता. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर प्रकरणी चर्चा करण्यासाठी संबंधित विकासकास तात्काळ म्हाडा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच निगुडकर यांना वितरित करण्यात आलेल्या बृहतसूचिवरील सदनिकेचा ताबा आज सकाळी बारा वाजेपर्यंत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गोरेगाव पश्चिम येथील स्नेहदीप सोसायटीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरूद्ध संजय भैरे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेवर होत असलेला अनधिकृत वापर तत्काळ थांबवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.


तसेच गिरगाव येथील भंडारवाडा क्रॉस रोडवरील दुर्गादेवी सोसायटी या पुनर्रचित इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून देण्याच्या मागणीसाठी गणेश शिंदे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी इमारतीच्या बाहेरील भागातील पाईपची व बंद पडलेल्या लिफ्टची तात्काळ दुरुस्ती करावी. सदर दुरुस्तीचे काम सोसायटीतील सभासदांनी नेमलेल्या देखरेख समितीच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकशाही दिनात मुंबई मंडळाशी संबंधित ४, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ ३, छत्रपती संभाजी मंडळाशी संबंधित १ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.