बाराव्या म्हाडा लोकशाही दिनात ८ अर्जांवर झाली सुनावणी

लोकाभिमुख निर्णयातून अर्जदारांना मिळाला दिलासा


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात १२वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकशाही दिनात नागरिकांच्या ८अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करत तत्परतेने निर्णय घेतला.



अँटॉप हिल वडाळा पूर्व येथील सदनिकेचा ताबा विकासकाकडून मिळू शकला नाही याकरिता निगुडकर यांनी अर्ज केला होता. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर प्रकरणी चर्चा करण्यासाठी संबंधित विकासकास तात्काळ म्हाडा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच निगुडकर यांना वितरित करण्यात आलेल्या बृहतसूचिवरील सदनिकेचा ताबा आज सकाळी बारा वाजेपर्यंत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गोरेगाव पश्चिम येथील स्नेहदीप सोसायटीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरूद्ध संजय भैरे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेवर होत असलेला अनधिकृत वापर तत्काळ थांबवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.


तसेच गिरगाव येथील भंडारवाडा क्रॉस रोडवरील दुर्गादेवी सोसायटी या पुनर्रचित इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून देण्याच्या मागणीसाठी गणेश शिंदे यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी इमारतीच्या बाहेरील भागातील पाईपची व बंद पडलेल्या लिफ्टची तात्काळ दुरुस्ती करावी. सदर दुरुस्तीचे काम सोसायटीतील सभासदांनी नेमलेल्या देखरेख समितीच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकशाही दिनात मुंबई मंडळाशी संबंधित ४, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ ३, छत्रपती संभाजी मंडळाशी संबंधित १ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन