रविवारच्या सुट्टीस १३५ वर्षे पूर्ण

नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतरत्न देण्याची मागणी


मुंबई : भारतीय चळवळीचे जनक, रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे, कनेरसर, जि.पुणे येथील सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८४८ रोजी झाला व निधन ९ फेब्रुवारी १८९७ रोजी झाले. भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना कामगार हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले.



भारतीय मिल व इतर कामगारांना आठवड्यातील सातही दिवस काम करायला लागायचे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ब्रिटीश सरकारसमोर सन १८८३ मध्ये ठेवला; परंतु ब्रिटीशांनी तो धुडकावला. आठवड्यातून एक दिवस देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी कामगारांना मिळायला हवा; त्या दृष्टीने रविवारची सुट्टी मिळावी या मागणीसाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी संघर्ष केला; सात वर्षांच्या संघर्षानंतर दि.१० जून १८९० रोजी ब्रिटीश सरकारतर्फे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस घोषित केला.मुंबईत १८९३ मध्ये हिंदू-मुसलमान दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटीश सरकारने रावबहाद्दूर ही पदवी बहाल केली.


रविवारच्या सुट्टीस १० जून २०२५ रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील कामगार चळवळीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. रविवारच्या सुट्टीचे निर्माते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. दि. ३ मे २००५ रोजी भारत सरकारने रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शुभहस्ते त्यांच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांच्या अलौकिक कार्यामुळे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करावी अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे.

Comments
Add Comment

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६