रविवारच्या सुट्टीस १३५ वर्षे पूर्ण

नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतरत्न देण्याची मागणी


मुंबई : भारतीय चळवळीचे जनक, रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे, कनेरसर, जि.पुणे येथील सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८४८ रोजी झाला व निधन ९ फेब्रुवारी १८९७ रोजी झाले. भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना कामगार हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले.



भारतीय मिल व इतर कामगारांना आठवड्यातील सातही दिवस काम करायला लागायचे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ब्रिटीश सरकारसमोर सन १८८३ मध्ये ठेवला; परंतु ब्रिटीशांनी तो धुडकावला. आठवड्यातून एक दिवस देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी कामगारांना मिळायला हवा; त्या दृष्टीने रविवारची सुट्टी मिळावी या मागणीसाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी संघर्ष केला; सात वर्षांच्या संघर्षानंतर दि.१० जून १८९० रोजी ब्रिटीश सरकारतर्फे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस घोषित केला.मुंबईत १८९३ मध्ये हिंदू-मुसलमान दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटीश सरकारने रावबहाद्दूर ही पदवी बहाल केली.


रविवारच्या सुट्टीस १० जून २०२५ रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील कामगार चळवळीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. रविवारच्या सुट्टीचे निर्माते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते. दि. ३ मे २००५ रोजी भारत सरकारने रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शुभहस्ते त्यांच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण केले होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांच्या अलौकिक कार्यामुळे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करावी अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत