WTC 2027: कसोटी चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला करावे लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासालाही सुरूवात होईल. दरम्यान, यावेळेस संघ अतिशय नवखा आणि कमी अनुभव असलेला आहे. असे असतानाही संघात असे काही खेळाडू आहेत जे हा प्रवास सोपा करू शकतात.


इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला हे. यावेळेस हा दौरा संघाच्या मोठ्या बदलादरम्यान आहे. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाविरुद्ध सलग मालिका हरला आहे. यासाठी जर संघाला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राची सुरूवात चांगली करायची असेल आणि त्याला चांगला ठिकाणी न्यायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.



गोलंदाजीच्या आक्रमणामध्ये सुधारणा


२०१६ पासून ते २०२१ पर्यंत भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठे कारण होते के त्यांची मजबूत गोलंदाजी. मात्र गेल्या दोन चॅम्पियनशिपमध्ये या गोलंदाजीच्या या आक्रमणामध्ये बदल होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराहवर संघ अवलंबून होता. हा एकमेव गोलंदाज होता ज्याने विरोधी संघाला त्रस्त केले होते.


मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे सतत आतबाहेर करत असतो. त्यामुळे गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. आर.अश्विनच्या निवृत्तीनंतर स्पिन हल्लाही कमकुवत झाला आहे. यामुळे टीम इंडियाला आपली गोलंदाजी मजबूत करावी लागेल.



कोहलीच्या जागेला पर्याय आणि केएल राहुल


केएल राहुल भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान, त्यासाठी एक निश्चित फलंदाजी क्रम ठरवणे गरजेचे आहे. राहुल कधी सलामीसाठी येतो तर कधी मधल्या फळीत. विराट आणि कोहलीच्या निवृ्त्तीनंतर आता त्याच्या जागेवर पर्याय शोधणे गरजेचे आहे.



नवे नेतृत्व मजबूestत बनवणे


भारताच्या फलंदाजीचा क्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबून होता. मात्र दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर आता संघाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक मजबूत लीडरशिप युनिटची गरज आहे. शुभमन गिल कर्णधार आणि ऋषभ पंत उपकर्णधार आणि विकेटकीपर बनवण्यात आले आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाने योग्य ते निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरवायला हवेत.


दरम्यान, केवळ कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मैदानावर उतरणारे सर्व क्रिकेटर हे यश-अपयशासाठी कारणीभूत असतात. अशातच ज्युनियर खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल आणि एकजूट होत चांगली कामगिरी करावी लागेल.

Comments
Add Comment

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Venezula Earthquake : फिफा वर्ल्ड कप सुरू असताना स्टार खेळाडूला मोठा धक्का ! भूकंपामध्ये पार्टनरचा..

Venezuela : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

बार्बुडा: वेस्ट इंडिजच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील

NZ VS ENG : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! एकाच वेळी तीन दिग्गज खेळाडूंनी घेतली निवृत्ती

इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर' लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाची विजयी घोडदौड कायम; मेस्सीचा नवा विक्रम

अर्लिंग्टन, टेक्सास : गतविजेत्या अर्जेंटिनाने जॉर्डनचा ३-१ असा पराभव करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गट फेरीचे

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रिया आणि अल्जेरियाची बाद फेरीत धडक; इराण स्पर्धेतून बाहेर

कॅन्सस सिटी: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या एका चित्तथरारक सामन्यात ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया