WTC 2027: कसोटी चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला करावे लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासालाही सुरूवात होईल. दरम्यान, यावेळेस संघ अतिशय नवखा आणि कमी अनुभव असलेला आहे. असे असतानाही संघात असे काही खेळाडू आहेत जे हा प्रवास सोपा करू शकतात.


इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला हे. यावेळेस हा दौरा संघाच्या मोठ्या बदलादरम्यान आहे. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाविरुद्ध सलग मालिका हरला आहे. यासाठी जर संघाला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राची सुरूवात चांगली करायची असेल आणि त्याला चांगला ठिकाणी न्यायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.



गोलंदाजीच्या आक्रमणामध्ये सुधारणा


२०१६ पासून ते २०२१ पर्यंत भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठे कारण होते के त्यांची मजबूत गोलंदाजी. मात्र गेल्या दोन चॅम्पियनशिपमध्ये या गोलंदाजीच्या या आक्रमणामध्ये बदल होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराहवर संघ अवलंबून होता. हा एकमेव गोलंदाज होता ज्याने विरोधी संघाला त्रस्त केले होते.


मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे सतत आतबाहेर करत असतो. त्यामुळे गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. आर.अश्विनच्या निवृत्तीनंतर स्पिन हल्लाही कमकुवत झाला आहे. यामुळे टीम इंडियाला आपली गोलंदाजी मजबूत करावी लागेल.



कोहलीच्या जागेला पर्याय आणि केएल राहुल


केएल राहुल भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान, त्यासाठी एक निश्चित फलंदाजी क्रम ठरवणे गरजेचे आहे. राहुल कधी सलामीसाठी येतो तर कधी मधल्या फळीत. विराट आणि कोहलीच्या निवृ्त्तीनंतर आता त्याच्या जागेवर पर्याय शोधणे गरजेचे आहे.



नवे नेतृत्व मजबूestत बनवणे


भारताच्या फलंदाजीचा क्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबून होता. मात्र दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर आता संघाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक मजबूत लीडरशिप युनिटची गरज आहे. शुभमन गिल कर्णधार आणि ऋषभ पंत उपकर्णधार आणि विकेटकीपर बनवण्यात आले आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाने योग्य ते निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरवायला हवेत.


दरम्यान, केवळ कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मैदानावर उतरणारे सर्व क्रिकेटर हे यश-अपयशासाठी कारणीभूत असतात. अशातच ज्युनियर खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल आणि एकजूट होत चांगली कामगिरी करावी लागेल.

Comments
Add Comment

Italian Open 2026 Jannik Sinner : जॅनिक सिनर ठरला इटालियन ओपनचा विजेता; केली नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाशी बरोबरी

- जॅनिक सिनर ठरला करिअर गोल्डन मास्टर्स पूर्ण करणारा जगातील दुसरा टेनिसपटू जॅनिक सिनरने इटालियन ओपन २०२६ चे

IPL 2026 DC vs RR : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर ५ विकेट्सने मात

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली

Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या