WTC 2027: कसोटी चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला करावे लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासालाही सुरूवात होईल. दरम्यान, यावेळेस संघ अतिशय नवखा आणि कमी अनुभव असलेला आहे. असे असतानाही संघात असे काही खेळाडू आहेत जे हा प्रवास सोपा करू शकतात.


इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला हे. यावेळेस हा दौरा संघाच्या मोठ्या बदलादरम्यान आहे. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाविरुद्ध सलग मालिका हरला आहे. यासाठी जर संघाला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राची सुरूवात चांगली करायची असेल आणि त्याला चांगला ठिकाणी न्यायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.



गोलंदाजीच्या आक्रमणामध्ये सुधारणा


२०१६ पासून ते २०२१ पर्यंत भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठे कारण होते के त्यांची मजबूत गोलंदाजी. मात्र गेल्या दोन चॅम्पियनशिपमध्ये या गोलंदाजीच्या या आक्रमणामध्ये बदल होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराहवर संघ अवलंबून होता. हा एकमेव गोलंदाज होता ज्याने विरोधी संघाला त्रस्त केले होते.


मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे सतत आतबाहेर करत असतो. त्यामुळे गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. आर.अश्विनच्या निवृत्तीनंतर स्पिन हल्लाही कमकुवत झाला आहे. यामुळे टीम इंडियाला आपली गोलंदाजी मजबूत करावी लागेल.



कोहलीच्या जागेला पर्याय आणि केएल राहुल


केएल राहुल भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान, त्यासाठी एक निश्चित फलंदाजी क्रम ठरवणे गरजेचे आहे. राहुल कधी सलामीसाठी येतो तर कधी मधल्या फळीत. विराट आणि कोहलीच्या निवृ्त्तीनंतर आता त्याच्या जागेवर पर्याय शोधणे गरजेचे आहे.



नवे नेतृत्व मजबूestत बनवणे


भारताच्या फलंदाजीचा क्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबून होता. मात्र दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर आता संघाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक मजबूत लीडरशिप युनिटची गरज आहे. शुभमन गिल कर्णधार आणि ऋषभ पंत उपकर्णधार आणि विकेटकीपर बनवण्यात आले आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाने योग्य ते निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरवायला हवेत.


दरम्यान, केवळ कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मैदानावर उतरणारे सर्व क्रिकेटर हे यश-अपयशासाठी कारणीभूत असतात. अशातच ज्युनियर खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल आणि एकजूट होत चांगली कामगिरी करावी लागेल.

Comments
Add Comment

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे.

PV Sindhu : चायना ओपनमध्ये पीव्ही सिंधूकडे भारताचे नेतृत्व; सात्विक आणि चिरागची दुखापतीमुळे माघार

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर ७५० विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही

Mansukh Mandaviya : भारतात १५ जुलैपर्यंत डोपिंगची ७८ प्रकरणे; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनकडून पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक भावुक! पत्रकार परिषदेत दाटला कंठ, अश्रू अनावर होताच...

न्यू जर्सी : फिफा विश्वचषकातील सर्वात चर्चित सामन्यांपैकी एक ठरलेल्या स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर

Rohit Sharma : 'निवृत्तीच्या चर्चा सुरु राहिल्या नाहीत तर...' हिटमॅनने एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सोडले मौन! VIDEO चर्चेत

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि एका नव्या युगाचा उदय!

फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा महासंग्राम मानला गेलेला फिफा विश्वचषक २०२६ अत्यंत रोमांचक वातावरणात