WTC 2027: कसोटी चॅम्पियन बनण्यासाठी टीम इंडियाला करावे लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासालाही सुरूवात होईल. दरम्यान, यावेळेस संघ अतिशय नवखा आणि कमी अनुभव असलेला आहे. असे असतानाही संघात असे काही खेळाडू आहेत जे हा प्रवास सोपा करू शकतात.


इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला हे. यावेळेस हा दौरा संघाच्या मोठ्या बदलादरम्यान आहे. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाविरुद्ध सलग मालिका हरला आहे. यासाठी जर संघाला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्राची सुरूवात चांगली करायची असेल आणि त्याला चांगला ठिकाणी न्यायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.



गोलंदाजीच्या आक्रमणामध्ये सुधारणा


२०१६ पासून ते २०२१ पर्यंत भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठे कारण होते के त्यांची मजबूत गोलंदाजी. मात्र गेल्या दोन चॅम्पियनशिपमध्ये या गोलंदाजीच्या या आक्रमणामध्ये बदल होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराहवर संघ अवलंबून होता. हा एकमेव गोलंदाज होता ज्याने विरोधी संघाला त्रस्त केले होते.


मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे सतत आतबाहेर करत असतो. त्यामुळे गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. आर.अश्विनच्या निवृत्तीनंतर स्पिन हल्लाही कमकुवत झाला आहे. यामुळे टीम इंडियाला आपली गोलंदाजी मजबूत करावी लागेल.



कोहलीच्या जागेला पर्याय आणि केएल राहुल


केएल राहुल भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान, त्यासाठी एक निश्चित फलंदाजी क्रम ठरवणे गरजेचे आहे. राहुल कधी सलामीसाठी येतो तर कधी मधल्या फळीत. विराट आणि कोहलीच्या निवृ्त्तीनंतर आता त्याच्या जागेवर पर्याय शोधणे गरजेचे आहे.



नवे नेतृत्व मजबूestत बनवणे


भारताच्या फलंदाजीचा क्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबून होता. मात्र दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीनंतर आता संघाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक मजबूत लीडरशिप युनिटची गरज आहे. शुभमन गिल कर्णधार आणि ऋषभ पंत उपकर्णधार आणि विकेटकीपर बनवण्यात आले आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाने योग्य ते निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरवायला हवेत.


दरम्यान, केवळ कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे मैदानावर उतरणारे सर्व क्रिकेटर हे यश-अपयशासाठी कारणीभूत असतात. अशातच ज्युनियर खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल आणि एकजूट होत चांगली कामगिरी करावी लागेल.

Comments
Add Comment

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा