मुंबईत अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका

  18

कोळी महिला व्यावसायीकांची सरकारकडे आर्थिक मदत देण्याची मागणी


मुंबई : अवकाळी पावसाचा फटका सुकी मासळीलाही बसला आहे. कोळी महिला व्यावसायीकांचे नुकसान झाले असून, शासनाकडून त्यांना पीक विमा योजनेचे सहाय्य मिळावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सचिवांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.


प्रत्येक वर्षी मच्छीमारांकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी सातत्याने केली जाते. या मागणीचा फक्त विचार केला जातो, परंतु कोळी महिलांना कसलेच आर्थिक सहाय्य दिले जात नाही.


हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या कोळी महिलांना आपला उदरनिर्वाह स्वाभिमानाने करण्यासाठी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या पीक विमा योजनेचे अर्थ सहाय्य देण्याची मागणी केल्याची माहिती तांडेल यांनी दिली. सुकी मासळीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला बंदरातून मासळी विकत घेऊन ते त्यांच्या गावातील हद्दीत असलेल्या सामूहिक जागेत मासळी सुकविण्याचा काम करत असतात. कोळी महिलासुद्धा सुक्या मासळीची लागवड करतात.


सूर्याच्या प्रकाशावर या मासळींना सुकविण्याची नैसर्गिक प्रक्रिया असून, अवकाळी पावसामुळे ही लागवड नष्ट झाली, असे समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घट चांदीच्या दरात मात्र वाढ 'ही' आहेत कारणे

प्रतिनिधी: आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. सतत चार दिवस सातत्यपूर्ण सोन्याच्या दरात भाववाढ

Rapido News: रॅपिड झोमॅटो व स्विगीला थेट टक्कर ! कंपनी झोमॅट स्विगीची मक्तेदारी 'अशी' संपवणार

प्रतिनिधी: रॅपिडो कंपनीने आता झोमॅटो (Zomato),स्विगी (Swiggy) या आपल्या स्पर्धक फूड डिलिव्हरी व्यासपीठांना (Food Delivery Aggregators)

Mumbai Railway Accident: अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे केले जाणार रीडिझाईनिंग ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण

Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लवकरच वरुणराजा बरसणार!

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर दाखवला होता, मात्र मागील आठवड्यापासून काही भागांत

सांडपाणीमुक्त पवई तलावासाठी लढा सुरूच

मूक साखळी रद्द, मात्र नागरिकांचा निर्धार कायम मुंबई : पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात रविवारी आयोजित