मुंबईत अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका

कोळी महिला व्यावसायीकांची सरकारकडे आर्थिक मदत देण्याची मागणी


मुंबई : अवकाळी पावसाचा फटका सुकी मासळीलाही बसला आहे. कोळी महिला व्यावसायीकांचे नुकसान झाले असून, शासनाकडून त्यांना पीक विमा योजनेचे सहाय्य मिळावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सचिवांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.


प्रत्येक वर्षी मच्छीमारांकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी सातत्याने केली जाते. या मागणीचा फक्त विचार केला जातो, परंतु कोळी महिलांना कसलेच आर्थिक सहाय्य दिले जात नाही.


हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या कोळी महिलांना आपला उदरनिर्वाह स्वाभिमानाने करण्यासाठी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या पीक विमा योजनेचे अर्थ सहाय्य देण्याची मागणी केल्याची माहिती तांडेल यांनी दिली. सुकी मासळीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला बंदरातून मासळी विकत घेऊन ते त्यांच्या गावातील हद्दीत असलेल्या सामूहिक जागेत मासळी सुकविण्याचा काम करत असतात. कोळी महिलासुद्धा सुक्या मासळीची लागवड करतात.


सूर्याच्या प्रकाशावर या मासळींना सुकविण्याची नैसर्गिक प्रक्रिया असून, अवकाळी पावसामुळे ही लागवड नष्ट झाली, असे समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या