हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती. मात्र आता सोनम देखील सापडली आहे.


राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे इंदूरचे नवविवाहित दाम्पत्य शिलाँग इथं हनिमूनसाठी गेले असता, काही दिवस बेपता होते. दरम्यान पोलिस तपासणीत काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला खरा, पण सोनम अद्याप बेपत्ताच होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला होता.  ज्यात त्यांना यश आले असून, पत्नी सोनम रघुवंशीसुद्धा पोलिसांना  सापडली आहे. परंतु, तिच्यासोबत आणखीन एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.



सोनमनेच केली पती राजा रघुवंशीची हत्या


या प्रकरणात स्वतः सोनमनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे. गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात मेघालयच्या डीजीपींनी असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती.



सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपीदेखील मध्य प्रदेशातील आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर एका महिला आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.’ या प्रकरणी पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलं.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात