हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

  95

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती. मात्र आता सोनम देखील सापडली आहे.


राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे इंदूरचे नवविवाहित दाम्पत्य शिलाँग इथं हनिमूनसाठी गेले असता, काही दिवस बेपता होते. दरम्यान पोलिस तपासणीत काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला खरा, पण सोनम अद्याप बेपत्ताच होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला होता.  ज्यात त्यांना यश आले असून, पत्नी सोनम रघुवंशीसुद्धा पोलिसांना  सापडली आहे. परंतु, तिच्यासोबत आणखीन एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.



सोनमनेच केली पती राजा रघुवंशीची हत्या


या प्रकरणात स्वतः सोनमनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे. गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात मेघालयच्या डीजीपींनी असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती.



सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपीदेखील मध्य प्रदेशातील आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर एका महिला आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.’ या प्रकरणी पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलं.

Comments
Add Comment

Indore Missing Couple चा अखेर खुलासा झालाच! 'या' कारणामुळे सोनमनेच दिली होती पती राजाला मारण्याची सुपारी

शिलाँग: मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे दाम्पत्य बेपत्ता झाल्याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे आता समोर

काळाच्या ओघातही टिकून संयुक्त कुटुंबाचे महत्त्व

संघाचे साहित्य प्रत्येक घरांत पोहोचवा : सरसंघचालक मोहन भागवतांची पंच परिवर्तनावर चर्चा कानपूर: कुंभमेळ्यात आपण

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी