‘आता मोबाइल ही चैनेची वस्तू राहिलेली नाही’

मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी


मुंबई:आजच्या जमान्यात मोबाईल ही केवळ चैनेची वस्तू राहिलेली नाही तर ती काळाची गरज बनली आहे. त्यामुळे खेडेगावातील लोकांना या गरजेच्या तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात नोंदवले.


सांगली जिल्ह्यातील तानंग गावातील अशोक चौगुले यांच्या जागेत एक मोबाइल टॉवर बसवला जाणार आहे, यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांची यासंदर्भात परवानगी घेण्यात आली. त्यानंतर टॅावरच्या बांधकामासाठी कंपनीने ग्रामपंचायतीकडे रितसर परवानगी मागितली होती. ग्रामपंचायतीने आधी याला परवानगी देऊ केली होती, त्यानुसार टॅावरचे बांधकाम करण्यात आलं.


मात्र मोबाइल टॉवर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप करीत काही ग्रामस्थांनी याविरोधात तक्रार केली. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने नव्याने ठराव करून आधी दिलेली परवानगी रद्द करून टाकली.


याविरोधात टॅावर कंपनीनं ॲड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवत ही याचिका मंजूर केली.


एनओसी रद्द करण्याआधी कंपनीला बाजू मांडण्याची संधी ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेली नाही. मोबाइल टॉवर आरोग्यासाठी धोकादायक आहे, याचा कोणताही अधिकृत अहवाल उपलब्ध नाही. त्यामुळे एनओसी रद्द करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय अयोग्य आहे, असा दावा कंपनीच्या वतीनं ज्येष्ठ वकील अंतुरकर यांनी केला. तर गावातील ११ ग्रामस्थांनी या मोबाइल टॉवरला विरोध केला होता.


ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊनच ग्रामपंचायतीनं ही एनओसी रद्द केली आहे,असा युक्तिवाद ग्रामस्थांच्या वतीने ॲड. तेजस दांडे यांनी केला. मात्र ग्रामस्थांच्या दाव्यात तथ्य न आढळल्याने हायकोर्टाने निकाल कंपनीच्या बाजूने देत या मोबाइल टॉवरला मंजुरी दिलीय.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपूर हादरले! बुटीबोरी एमआयडीसीत भीषण दुर्घटना, ६ कामगारांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी

रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"ऋषभायन-2" वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व 'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

Bollywood actress Shilpa Shetty... बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणखी एक दणका! मुंबईतील या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ती तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे.